शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 09:25 IST

केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय.

ठळक मुद्दे शशी थरुर यांनी म्हटलं, माझे मित्र,  माजी प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की, केरळमधील लोक भाजपाला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात.  

नवी दिल्ली - देशातील 5 राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात आता चांगलीच रंगत आली आहे. आठ टप्प्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २७ मार्चपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. (West Bengal Assembly Elections 2021) दरम्यान, मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. या ओपिनियन पोलमधून पश्चिम बंगालमध्ये भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर तृणमूल काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावर घसगुंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण भारतात भाजपला समर्थन नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजपा नेत्यानंच ही कबुली दिलीय. 

केरळमध्ये 6 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. केरळमधून यंदा भाजपला मोठी आशा आहे, पण येथील ज्येष्ठ भाजप नेत्यानेच पक्षाला झटका दिलाय. केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत.

हरयाणा आणि त्रिपुरा येथे पक्षाने आगेकूच केलीय, तर पश्चिम बंगालमध्येही कमी वेळेत भाजपाने रणनिती बनवलीय. मग, केरळमध्ये भाजपा सक्षम का ठरत नाही? असा प्रश्न राजगोपाल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, केरळमध्ये भाजपला मोठं समर्थन न मिळण्यास दोन-तीन कारणं आहेत. केरळचा साक्षरता दर 90 टक्के आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात. शिक्षित लोकांची ही सवयच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आहेत, आणि 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये ही बाबही येते. त्यातच, केरळची तुलना इतर कुठल्याही राज्यासोबत केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थिती जरा वेगळीच आहे, पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, असे ओ राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय. 

राजगोपाल यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी लगेचच भाजपला लक्ष्य केलंय. शशी थरुर यांनी म्हटलं, माझे मित्र,  माजी प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की, केरळमधील लोक भाजपाला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात.  तर, काँग्रेसनेही अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत, राजगोपल यांचं विधान शेअर केलंय. तसेच, फक्त केरळच नाही, संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही, असे काँग्रेसने म्हटलंय.  

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021