शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 09:25 IST

केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय.

ठळक मुद्दे शशी थरुर यांनी म्हटलं, माझे मित्र,  माजी प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की, केरळमधील लोक भाजपाला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात.  

नवी दिल्ली - देशातील 5 राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात आता चांगलीच रंगत आली आहे. आठ टप्प्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २७ मार्चपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. (West Bengal Assembly Elections 2021) दरम्यान, मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. या ओपिनियन पोलमधून पश्चिम बंगालमध्ये भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर तृणमूल काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावर घसगुंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण भारतात भाजपला समर्थन नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजपा नेत्यानंच ही कबुली दिलीय. 

केरळमध्ये 6 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. केरळमधून यंदा भाजपला मोठी आशा आहे, पण येथील ज्येष्ठ भाजप नेत्यानेच पक्षाला झटका दिलाय. केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत.

हरयाणा आणि त्रिपुरा येथे पक्षाने आगेकूच केलीय, तर पश्चिम बंगालमध्येही कमी वेळेत भाजपाने रणनिती बनवलीय. मग, केरळमध्ये भाजपा सक्षम का ठरत नाही? असा प्रश्न राजगोपाल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, केरळमध्ये भाजपला मोठं समर्थन न मिळण्यास दोन-तीन कारणं आहेत. केरळचा साक्षरता दर 90 टक्के आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात. शिक्षित लोकांची ही सवयच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आहेत, आणि 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये ही बाबही येते. त्यातच, केरळची तुलना इतर कुठल्याही राज्यासोबत केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थिती जरा वेगळीच आहे, पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, असे ओ राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय. 

राजगोपाल यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी लगेचच भाजपला लक्ष्य केलंय. शशी थरुर यांनी म्हटलं, माझे मित्र,  माजी प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की, केरळमधील लोक भाजपाला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात.  तर, काँग्रेसनेही अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत, राजगोपल यांचं विधान शेअर केलंय. तसेच, फक्त केरळच नाही, संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही, असे काँग्रेसने म्हटलंय.  

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021