शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

अमृतसर दुर्घटनेतून बोध नाहीच; छठ पुजेसाठी शेकडो लोक रेल्वे ट्रॅकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:42 IST

सुदैवानं अमृतसर अपघाताची पुनरावृत्ती टळली

भटिंडा: अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या रेल्वेअपघाताच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. त्या दुर्घटनेत 61 जणांनी जीव गमावला होता. मात्र त्यानंतरही सर्वसामान्य लोक कोणताही बोध घेत नाहीत. भटिंडामध्ये छठ पूजा साजरी करताना याचा प्रत्यय आला आहे. शेकडो लोक छठपूजा करण्यासाठी रेल्वे रुळांवर आले होते. विशेष म्हणजे हे सर्व लोक एका पुलावर उभे होते. त्यामुळे जर ट्रेन आली असती, तर अनेकांना बाजूलाही होता आलं नसतं. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.  भटिंडात छठ पूजा साजरी करण्यासाठी शेकडो लोक रेल्वे रुळांवर उभे होते. रुळांखालून सरहिंद कालवा जात असल्यानं या भागात मोठी गर्दी झाली होती. शेकडो महिला, मुलं, पुरुष रुळांवर उभे होते. यावेळी रेल्वे आणि पोलिसांनी लोकांना रुळांवरुन हटण्याची सूचना केली. यासाठी रेल्वेनं अनेकदा घोषणादेखील केल्या. मात्र तरीही गर्दी रुळांवरुन बाजूला झाली नाही. याचवेळी एखादी ट्रेन आली असती, तर अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती झाली असती. मात्र सुदैवानं यावेळी कोणतीही ट्रेन आली नाही. ज्या रेल्वे रुळांवर शेकडो लोक छठ पूजेसाठी जमा झाले होते, तिथून दररोज 15 लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातPunjabपंजाब