शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जनतेने भाजपाचा अहंकार मोडला, पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:36 IST

Congress Criticize BJP: राजस्थानमधील श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. हा निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा काँग्रेसच्या रूपिंदर सिंह कुन्नूर यांनी पराभव केला आहे.

राजस्थानमधील श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. हा निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा काँग्रेसच्या रूपिंदर सिंह कुन्नूर यांनी पराभव केला आहे. या विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून, श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपाचा अहंकार मोडून काढला, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. 

या विजयानंतर सोशल मीडियावर विजयी उमेदवार रूपिंदर सिंह कुन्नूर यांचा फोटो शेअर करत काँग्रेसनेभाजपाला शाब्दिक टोले लगावले आहेत. श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने सत्तेच्या अहंकारातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला मंत्री बनवून आचारसंहितेची खिल्ली उडवली होती. मात्र श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपाचा हा अहंकार मोडीत काढला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्री रूपिंदर सिंह कुन्नूर यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या अहंकारी नेत्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, त्यांनी कुणालाही मंत्री बनवलं तरी शेवटी लोकप्रतिनिधी जनताच बनवते.

श्रीकरणपूर या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांचं निधन झाल्याने  येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजस्थानमध्ये १९९ जागांसाठीच मतदान झालं होतं. तर श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतंच मतदान झालं होतं. त्यात मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे.  सुरेंद्र पाल सिंह टीटी यांनी दहा दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या सरकारमध्ये सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले होते. मात्र आजच्या पराभवामुळे  त्यांचं मंत्रिपद औटघटकेचं ठरलं आहे.    

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थान