शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 16:09 IST

'सरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्याठी मणिपूरचे अस्तित्वच नाही.'

Parliament Session : आज 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, आज सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसाचार पसरवतात, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल यांनी केली. याशिवाय, अग्नीवीर योजना, NEET परीक्षेतील गोंधळ, इनकम टॅक्स-ईडीच्या धाडी, मणिपूर हिंसाचार, जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा, अशा विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

लिहून ठेवा, गुजरातमध्ये तुमचा पराभव करणारराहुल गांधी म्हणाले की, इनकम टॅक्स आणि ईडी सर्व लहान व्यावसायिकांच्या मागे लागले आहेत, जेणेकरून अब्जाधीशांचा मार्ग मोकळा होईल. मी गुजरातला गेलो, तेव्हा कापड उद्योगातील लोकांनी मला सांगितले की, जीएसटी अब्जाधीशांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणला आहे. लिहून ठेवा, आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये तुमचा पराभव करणार, असे आव्हान राहुल यांनी भाजपला दिले.

'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब', राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदींचा पलटवार

मणिपूर त्यांच्यासाठी अस्तित्वात नाहीसरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. भारतात पहिल्यांदा असे घडले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याठी मणिपूरचे तर काही अस्तित्वच नाही. आम्ही मणिपूरला जाण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले, पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले, रोजगार संपवला. आता NEET परीक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. संपूर्ण परीक्षा श्रीमंत मुलांसाठी केली जाते. हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असून, तुम्ही तयार केलेले 70 पेपर फुटलेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पेपरफुटीबाबत किंवा अग्निवीरबाबत कोणतीही चर्चा होत नाही. आम्ही एक दिवसाच्या चर्चेची मागणी केली, तर सरकारने नकार दिला, अशी टीकाही त्यांनी यावेली केली.

तुम्ही शेतकऱ्यांशी बोलत नाही, त्यांना दहशतवादी म्हणताराहुल पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी आम्ही जे भूसंपादन विधेयक तयार केले होते, ते तुम्ही रद्द केले. शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी तीन नवीन कायदे आणले, हे अंबानी-अदानींच्या फायद्याचे कायदे होते. शेतकरी रस्त्यावर आले, तुम्ही शेतकऱ्यांशी बोलतही नाही, तुम्ही त्यांना जवळ घेतले नाही. उलट त्यांनाच दहशतवादी घोषित केले. तुम्ही मृत शेतकऱ्यांसाठी मौन पाळले नाही. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, शेतकऱ्यांना एमएसपी दिली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद