शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 16:09 IST

'सरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्याठी मणिपूरचे अस्तित्वच नाही.'

Parliament Session : आज 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, आज सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसाचार पसरवतात, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल यांनी केली. याशिवाय, अग्नीवीर योजना, NEET परीक्षेतील गोंधळ, इनकम टॅक्स-ईडीच्या धाडी, मणिपूर हिंसाचार, जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा, अशा विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

लिहून ठेवा, गुजरातमध्ये तुमचा पराभव करणारराहुल गांधी म्हणाले की, इनकम टॅक्स आणि ईडी सर्व लहान व्यावसायिकांच्या मागे लागले आहेत, जेणेकरून अब्जाधीशांचा मार्ग मोकळा होईल. मी गुजरातला गेलो, तेव्हा कापड उद्योगातील लोकांनी मला सांगितले की, जीएसटी अब्जाधीशांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणला आहे. लिहून ठेवा, आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये तुमचा पराभव करणार, असे आव्हान राहुल यांनी भाजपला दिले.

'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब', राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदींचा पलटवार

मणिपूर त्यांच्यासाठी अस्तित्वात नाहीसरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. भारतात पहिल्यांदा असे घडले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याठी मणिपूरचे तर काही अस्तित्वच नाही. आम्ही मणिपूरला जाण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले, पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले, रोजगार संपवला. आता NEET परीक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. संपूर्ण परीक्षा श्रीमंत मुलांसाठी केली जाते. हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असून, तुम्ही तयार केलेले 70 पेपर फुटलेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पेपरफुटीबाबत किंवा अग्निवीरबाबत कोणतीही चर्चा होत नाही. आम्ही एक दिवसाच्या चर्चेची मागणी केली, तर सरकारने नकार दिला, अशी टीकाही त्यांनी यावेली केली.

तुम्ही शेतकऱ्यांशी बोलत नाही, त्यांना दहशतवादी म्हणताराहुल पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी आम्ही जे भूसंपादन विधेयक तयार केले होते, ते तुम्ही रद्द केले. शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी तीन नवीन कायदे आणले, हे अंबानी-अदानींच्या फायद्याचे कायदे होते. शेतकरी रस्त्यावर आले, तुम्ही शेतकऱ्यांशी बोलतही नाही, तुम्ही त्यांना जवळ घेतले नाही. उलट त्यांनाच दहशतवादी घोषित केले. तुम्ही मृत शेतकऱ्यांसाठी मौन पाळले नाही. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, शेतकऱ्यांना एमएसपी दिली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद