शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील बेरोजगारीमुळे संसदेच्या सुरक्षेत चूक; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 19:36 IST

Parliament Security Breach: संसद घुसखोरी प्रकरणात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे.

Rahul Gandhi statement on Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेच्या (Parliament Security Breach) मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अधिवेशनात विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. यामुळे दोन दिवस कामकाज होऊ शकले नाही. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षानेही राहुल यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. 

शनिवारी(16 डिसेंबर) एएनआयशी वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली, पण असे झालेच कसे? बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असून संपूर्ण देशच उफाळून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नाहीय. बेरोजगारी आणि महागाई, हे संसदेच्या सुरक्षिततेच्या कमतरतेचे एक कारण आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे.

राहुल गांधी नॉन सीरियस- प्रल्हाद जोशीराहुल गांधींच्या टीकेवर पलटवर करताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, राहुल गांधींचे विधान नॉन सीरिसय आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींना समजून सांगायला हवे. सुरक्षेतील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. 

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही जोरदार टीका करत राहुल गांधींवर पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजनांमुळे या देशातून गरिबी, बेरोजगारी हटत असून तरुणांना रोजगार मिळत आहे, याचा विचार राहुल गांधींनी करायला हवा. राहुल गांधी कधी, काय बोलतील याची त्यांनाही कल्पना नाही, अशी टीका त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. संसदेत त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी संबंधित लोकांनी सभागृहात उड्या मारल्या. ते याचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्याने लोकांना हसू येतं, अशी टीका त्यांनी केली.

भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचे विधान रिट्विट करत लिहिले की, राहुल गांधी नेहमीच मूर्खपणाची वक्तव्ये करतात. भारतातील बेरोजगारी 3.2% आहे, जी 6 वर्षातील सर्वात कमी आहे, असे म्हटले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपाcongressकाँग्रेस