शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयपी’ना ‘ब्लॅक कॅट’ सुरक्षा नाही; सुरक्षेचे काम निमलष्करी दलांकडे सोपविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:39 IST

‘सीआरपीएफ’ व ‘सीआयएसएफ’ या निमलष्करी दलांकडे सध्या सुमारे १३० व्यक्तिंच्या सुरक्षेचे काम आहे. त्याच जोडीला ते सध्या ‘एनएसजी’ सुरक्षा असलेल्यांची जबाबदारीही सहजपणे सांभाळू शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली: देशातील कोणाही अति महत्वाच्या व्यक्तिला (व्हीआयपी) यापुढे ‘नॅशनल सेक्युरिटी गार्ड््स’च्या (एनएसजी) ‘ब्लॅक कॅट कमांडों’ची सुरक्षा न देता ते काम केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यासारख्या निमलष्करी दलांकडे सोपविण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.

‘व्हीआयपी’ सुरक्षेच्या कामातून सुटका झाली की ‘एनएसजी’च्या सर्व ४५० कमांडोंचा नेमून दिलेल्या मूळ कामासाठी अधिक प्रभावीपणे व तत्परतेने वापर करणे शक्य होईल. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ‘एनएसजी’ कमांडोंनी किती चोख कामगिरी केली हे सर्व देशाने पाहिले होते. हा विचार सन २०१२ पासून सुरु आहे. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी कर्तव्यांच्या या फेररचनेचे काम नेटाने करण्याचे ठरविले आहे.

मध्यंतरी वरिष्ठ पातळीवर फेरआढावा घेण्यात आला तेव्हा असे ठरले की, जेथे ‘एनएसजी’चा वापर करावा लागेल अशा घटना देशात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणी घडल्या तरी त्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी हे विशेष दल कायम सज्ज असायला हवे. मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी तीन दिवस मिळून एकूण ४०० ‘एनएसजी’ कमांडोंनी आलटून पालटून कर्तव्य बजावले होते.

सध्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मायावती, मुलायम सिंग, चंद्राबाबू नायडूव प्रकाश सिंग बादल या माजी मुख्यमंत्र्यांसह आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल व ज्येष्ठ भाजपा नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ठ आडवाणी यांना ‘एनएसजी’ सुरक्षा आहे. याखेरीज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व त्यांच्या पत्नी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांची राहुल आणि प्रियांका ही मुले यांची ‘एनएसजी’ सुरक्षा अलिकडेच काढून घेण्यात आली आहे. ‘सीआरपीएफ’ व ‘सीआयएसएफ’ या निमलष्करी दलांकडे सध्या सुमारे १३० व्यक्तिंच्या सुरक्षेचे काम आहे. त्याच जोडीला ते सध्या ‘एनएसजी’ सुरक्षा असलेल्यांची जबाबदारीही सहजपणे सांभाळू शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.‘एनएसजी’कडून हे काम अपेक्षितच नव्हतेप्रामुख्याने दहशतवादी विरोधीव विमान अपहरण विरोधी अशा जोखमीच्या मोहिमांसाठी लष्करातील निवडक अशा खास प्रशिक्षित अधिकारी व जवानांची ‘एनएसजी’ ही स्वतंत्र तुकडी १९८४मध्ये स्थापन केली गेली तेव्हा त्यांनी ‘व्हीआयपी’ सुरक्षेचे काम करावे, असे बिलकूल अपेक्षित नव्हते. परंतु गेली २० वर्षे ‘एनएसजी’चा या कामासाठी वापर केला जात आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार