शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:44 IST

गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे.

नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सत्तांतर होणार की मोदींची सत्ता कायम राहणार याची उत्सुकात पाकिस्तानी नागरिक आणि उच्चपदस्थामध्ये आहे. त्यातही भारतात पुन्हा मोदींची सत्ता येऊ नये, असे अनेक पाकिस्तानी नागरिकांना वाटते. काही महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेली एअरस्ट्राइक हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.  पाकिस्तानी नागरिक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या पुन्हा सत्तेत येण्याबाबतचे मत तेथील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तसेच अनेक पाकिस्तानी नागरिकांकडून सोशल मीडियावरही  भारतातील निवडणुकांसंदर्भातील पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रसारित केले आहे. 

मोदींनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केली होती. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे लाहोर येथे राहणाऱ्या शाही आलम यांनी वृत्तवाहिनीला सांगितले. तर  मोदी पुन्हा बहुमताने सत्तेवर येतील याबाबत माझ्या मनात शंका आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही, ही बाब पाकिस्तानच्या दृष्टीने चांगली असेल, असे अन्य एका व्यक्तीने सांगितले. दरम्यान, मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची शक्यता वाढेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.  मात्र पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांपेक्षा देशाबाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तींची मोदींबाबतची भूमिका वेगळी आहे. लंडन येथे राहणारे पाकिस्तानी उद्योगपती रियाझ सांगतात की, ''मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत. त्यामुळे पाकिस्तानी भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी संघटनांना आळा बसू शकेल. तसेच पाकिस्तानी सरकारवर दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी मोदी दबाव आणू शकतात.''   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान