शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:44 IST

गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे.

नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सत्तांतर होणार की मोदींची सत्ता कायम राहणार याची उत्सुकात पाकिस्तानी नागरिक आणि उच्चपदस्थामध्ये आहे. त्यातही भारतात पुन्हा मोदींची सत्ता येऊ नये, असे अनेक पाकिस्तानी नागरिकांना वाटते. काही महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेली एअरस्ट्राइक हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.  पाकिस्तानी नागरिक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या पुन्हा सत्तेत येण्याबाबतचे मत तेथील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तसेच अनेक पाकिस्तानी नागरिकांकडून सोशल मीडियावरही  भारतातील निवडणुकांसंदर्भातील पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रसारित केले आहे. 

मोदींनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केली होती. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे लाहोर येथे राहणाऱ्या शाही आलम यांनी वृत्तवाहिनीला सांगितले. तर  मोदी पुन्हा बहुमताने सत्तेवर येतील याबाबत माझ्या मनात शंका आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही, ही बाब पाकिस्तानच्या दृष्टीने चांगली असेल, असे अन्य एका व्यक्तीने सांगितले. दरम्यान, मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची शक्यता वाढेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.  मात्र पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांपेक्षा देशाबाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तींची मोदींबाबतची भूमिका वेगळी आहे. लंडन येथे राहणारे पाकिस्तानी उद्योगपती रियाझ सांगतात की, ''मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत. त्यामुळे पाकिस्तानी भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी संघटनांना आळा बसू शकेल. तसेच पाकिस्तानी सरकारवर दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी मोदी दबाव आणू शकतात.''   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान