शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

पाकिस्तानी नागरिकानं 18 वेळा केला भारताचा दौरा, गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 23:31 IST

Himanta Biswa Sarma : या प्रकरणातील प्राथमिक माहिती काँग्रेससाठी 'अत्यंत घातक' आहे आणि याचा आसामच्या राजकारणावर 'मोठा परिणाम' होणार आहे, असा दावाही सरमा यांनी यावेळी केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी गुरुवारी विधानसभेत एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, आसामपोलिसांनी देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेखने २०१० ते २०१८ दरम्यान १८ वेळा भारताचा दौरा केला. एवढेच नाही तर, या प्रकरणातील प्राथमिक माहिती काँग्रेससाठी 'अत्यंत घातक' आहे आणि याचा आसामच्या राजकारणावर 'मोठा परिणाम' होणार आहे, असा दावाही सरमा यांनी यावेळी केला आहे. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील विधानसभेत चर्चेदरम्यान बोलत होते.

SIT कडे तपास, ऑगस्टपर्यंत मोठ्या खुलाशाच्या दावा -आसाम पोलिसांनी सोमवारी अली तौकीर शेख आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल  केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले, "एसआयटी स्थापन झाल्यानंतर केवळ दोनच दिवसांत, शेखने नोव्हेंबर २०१० ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान १८ वेळा भारत दौरा केला, अशी माहिती आम्हाला मिळाली. लवकरच हे देखील स्पष्ट होईल की त्याला भारतात कोणी आमंत्रित केले होते? त्या कोठे थांबवण्यात आले होते? आणि या दौऱ्यांत त्याने काय केले?" 

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, "हे प्रकरण ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आसामचे राजकारण प्रचंड प्रभावित करेल. तौकीर स्वतःला हवामान कार्यकर्ता म्हणवतो, मात्र त्याला आसाम आणि भारताच्या अंतर्गत राजकारणात अधिक रस होता, असे वाटते."

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन असल्याचा आरोप - रविवारी, आसाम मंत्रिमंडळाने पोलिसांना अली तौकीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांच्याशी त्यांचे काही संबंध होते का आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला काही धोका निर्माण होऊ शकतो का? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एलिझाबेथ या ब्रिटिश नागरिक आहे.

मुख्यमंत्री सर्मा यांनी असाही दावा केला आहे की, एलिझाबेथ गोगोई या इस्लामाबादमधील त्यांच्या कार्यकाळात शेख यांनी स्थापन केलेल्या लीड पाकिस्तान नावाच्या एका ना-नफा संस्थेचा भाग होत्या. ते दोघेही भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये काम करणाऱ्या क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क (सीडीकेएन) नावाच्या जागतिक हवामान समूहाचे सदस्यही होते." दरम्यान, गौरव गोगोई यांनी, हे आरोप "निराधार आणि बदनामीचे षड्यंत्र" असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान