शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाकिस्तानी नागरिकानं 18 वेळा केला भारताचा दौरा, गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 23:31 IST

Himanta Biswa Sarma : या प्रकरणातील प्राथमिक माहिती काँग्रेससाठी 'अत्यंत घातक' आहे आणि याचा आसामच्या राजकारणावर 'मोठा परिणाम' होणार आहे, असा दावाही सरमा यांनी यावेळी केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी गुरुवारी विधानसभेत एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, आसामपोलिसांनी देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेखने २०१० ते २०१८ दरम्यान १८ वेळा भारताचा दौरा केला. एवढेच नाही तर, या प्रकरणातील प्राथमिक माहिती काँग्रेससाठी 'अत्यंत घातक' आहे आणि याचा आसामच्या राजकारणावर 'मोठा परिणाम' होणार आहे, असा दावाही सरमा यांनी यावेळी केला आहे. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील विधानसभेत चर्चेदरम्यान बोलत होते.

SIT कडे तपास, ऑगस्टपर्यंत मोठ्या खुलाशाच्या दावा -आसाम पोलिसांनी सोमवारी अली तौकीर शेख आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल  केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले, "एसआयटी स्थापन झाल्यानंतर केवळ दोनच दिवसांत, शेखने नोव्हेंबर २०१० ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान १८ वेळा भारत दौरा केला, अशी माहिती आम्हाला मिळाली. लवकरच हे देखील स्पष्ट होईल की त्याला भारतात कोणी आमंत्रित केले होते? त्या कोठे थांबवण्यात आले होते? आणि या दौऱ्यांत त्याने काय केले?" 

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, "हे प्रकरण ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आसामचे राजकारण प्रचंड प्रभावित करेल. तौकीर स्वतःला हवामान कार्यकर्ता म्हणवतो, मात्र त्याला आसाम आणि भारताच्या अंतर्गत राजकारणात अधिक रस होता, असे वाटते."

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन असल्याचा आरोप - रविवारी, आसाम मंत्रिमंडळाने पोलिसांना अली तौकीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांच्याशी त्यांचे काही संबंध होते का आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला काही धोका निर्माण होऊ शकतो का? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एलिझाबेथ या ब्रिटिश नागरिक आहे.

मुख्यमंत्री सर्मा यांनी असाही दावा केला आहे की, एलिझाबेथ गोगोई या इस्लामाबादमधील त्यांच्या कार्यकाळात शेख यांनी स्थापन केलेल्या लीड पाकिस्तान नावाच्या एका ना-नफा संस्थेचा भाग होत्या. ते दोघेही भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये काम करणाऱ्या क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क (सीडीकेएन) नावाच्या जागतिक हवामान समूहाचे सदस्यही होते." दरम्यान, गौरव गोगोई यांनी, हे आरोप "निराधार आणि बदनामीचे षड्यंत्र" असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान