शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 10:47 IST

जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

श्रीनगर - जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सुंजवां येथील लष्कर तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 6 जवान शहीद झाले होते आणि काही जण जखमीदेखील झाले होते. सीतारमण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी सीतारमण यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच दिला. पत्रकार परिषद घेत सीतारमण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ''सुंजवांमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे. मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल'', असे सीतारमण यांनी यावेळी म्हटले. 

सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे1 -  सुंजवां येथील लष्करी तळावर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यांना पाकिस्तानातून मदत करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे2 - जैश-ए-मोहम्महदच्या ज्या दहशतवाद्यांना हल्ला केला, त्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात घुसखोरी केली असावी. स्थानिक नागरिकांकडून घुसखोरीसाठी मदत मिळाल्याचंही शक्यता वर्तवण्यता येत आहे.  3 - दहशतवादी आता कमजोर घटकांना टार्गेट करू शकतात. यासाठी सुंजवांतील लष्करी तळावर फॅमिली क्वॉटर्स परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 - पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया आता पीर पंजाल रेंजच्याही पुढे पसरत चालल्या आहेत. शिवाय, भारतात दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप सीतारामण यांनी केला आहे. 5 - पाकिस्तानाकडून वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांना आणि आमच्या देशात हिंसा पसरवण्यासाठी प्रयत्न करणा-यांना सडेतोड उत्तर देऊ - निर्मला सीतारमण6 - या हल्ल्यानंतर सर्व पुरावे गोळा केलेले आहेत आणि एनआयएकडून याबाबत चौकशी करण्यात येत आहे.  7 - या सर्व पुराव्यांना पाकिस्तानकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. कित्येक पुरावे, अहवाल सोपवल्यानंतरही पाकिस्ताननं तेथील दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलत कारवाई केलेली नाही. 8 - भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचं वारंवार समोर आले आहे. 9 - आता सीमारेषेवर अत्याधुनिक शस्त्रांसहीत सैन्य तैनात केले जाणार आहे आणि देखरेखदेखीव वाढवण्यात येईल.10 - शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद