शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 10:47 IST

जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

श्रीनगर - जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सुंजवां येथील लष्कर तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 6 जवान शहीद झाले होते आणि काही जण जखमीदेखील झाले होते. सीतारमण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी सीतारमण यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच दिला. पत्रकार परिषद घेत सीतारमण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ''सुंजवांमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे. मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल'', असे सीतारमण यांनी यावेळी म्हटले. 

सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे1 -  सुंजवां येथील लष्करी तळावर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यांना पाकिस्तानातून मदत करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे2 - जैश-ए-मोहम्महदच्या ज्या दहशतवाद्यांना हल्ला केला, त्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात घुसखोरी केली असावी. स्थानिक नागरिकांकडून घुसखोरीसाठी मदत मिळाल्याचंही शक्यता वर्तवण्यता येत आहे.  3 - दहशतवादी आता कमजोर घटकांना टार्गेट करू शकतात. यासाठी सुंजवांतील लष्करी तळावर फॅमिली क्वॉटर्स परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 - पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया आता पीर पंजाल रेंजच्याही पुढे पसरत चालल्या आहेत. शिवाय, भारतात दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप सीतारामण यांनी केला आहे. 5 - पाकिस्तानाकडून वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांना आणि आमच्या देशात हिंसा पसरवण्यासाठी प्रयत्न करणा-यांना सडेतोड उत्तर देऊ - निर्मला सीतारमण6 - या हल्ल्यानंतर सर्व पुरावे गोळा केलेले आहेत आणि एनआयएकडून याबाबत चौकशी करण्यात येत आहे.  7 - या सर्व पुराव्यांना पाकिस्तानकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. कित्येक पुरावे, अहवाल सोपवल्यानंतरही पाकिस्ताननं तेथील दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलत कारवाई केलेली नाही. 8 - भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचं वारंवार समोर आले आहे. 9 - आता सीमारेषेवर अत्याधुनिक शस्त्रांसहीत सैन्य तैनात केले जाणार आहे आणि देखरेखदेखीव वाढवण्यात येईल.10 - शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद