शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 8:27 PM

काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे.

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्यातच काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे. आज देखील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. मात्र भारतीय जवानांनी देखील त्यांच्या या नापाक कृत्याला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं पूँछमधील केजी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. तसेच खोट्या अफवा पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या इंटर- सर्विसेज पब्लिक रिलेशंस संस्थेने देखील पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे कबुल केले आहे. परंतु या चकमकीत पाकिस्तानच्या सैनिकांकडून भारताचे 5 जवान शहीद झाल्याचा दावा केला. मात्र पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा भारतीय लष्कराने सांगितले. 

भारतीय लष्कराचे नॅार्दन कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपासून पाकिस्तानाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु भारतीय लष्कर पूर्णपणे सर्तक असून घुसखोरीच्या प्रयत्नांना उधळून लावले आहे. तसेच पाकिस्तानचे नापाक कृत्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही अशी पाकिस्तानला तंबी देखील दिली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत