शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एअर स्ट्राईकनंतरही पाकच्या कुरापती सुरुच, 513 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 11:46 IST

पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यांमध्ये तब्बल 513 वेळा भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात आलं. मात्र या स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यांमध्ये तब्बल 513 वेळा भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने जशास तसं उत्तर दिल्याने भारताच्या तुलनेत पाकिस्तानचं पाचपटीने अधिक नुकसान झाल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात येतंय. 

व्हाइट नाइट कोरचे जनरल अधिकारी लेफ्टनंट परमजीत सिंह यांनी राजौरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना 100 पेक्षा अधिक मोर्टार आणि तोफांसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. विशेषकरुन पाकिस्ताने भारतातील मानवी वस्त्यांना टार्गेट केलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सेनेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

मागील दिड महिन्यात तब्बल 513 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. शुक्रवारीच पुंछ सेक्टर भागात दोन मुलींसह चार लष्करी जवान गोळीबारीत जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही आक्रमक उत्तर देत आहेत. भारतीय सैन्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं सर्वाधिक नुकसान झालं असून त्यांच्याकडून सत्य लपवलं जात आहे. मात्र भारतीय लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे पाचपटीने अधिक नुकसान झालं आहे अशी माहिती लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी दिली. 

श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

पाकिस्तानच्या बालकोट भागात भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 4 जवानांसह 10 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 45 जण जखमी आहे. मात्र भारतीय लष्कराचे मनोबल वाढलेलं आहेत. जोपर्यंत सीमेवर भारतीय जवान तैनात आहेत तोवर देशातील नागरिकांनी कोणतीच चिंता बाळगू नका असं आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आलं आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची हत्यारं आणि विस्फोटक तयार आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. असा विश्वास लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी देशवासियांना दिला.    

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndian Armyभारतीय जवान