शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

एअर स्ट्राईकनंतरही पाकच्या कुरापती सुरुच, 513 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 11:46 IST

पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यांमध्ये तब्बल 513 वेळा भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात आलं. मात्र या स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यांमध्ये तब्बल 513 वेळा भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने जशास तसं उत्तर दिल्याने भारताच्या तुलनेत पाकिस्तानचं पाचपटीने अधिक नुकसान झाल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात येतंय. 

व्हाइट नाइट कोरचे जनरल अधिकारी लेफ्टनंट परमजीत सिंह यांनी राजौरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना 100 पेक्षा अधिक मोर्टार आणि तोफांसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. विशेषकरुन पाकिस्ताने भारतातील मानवी वस्त्यांना टार्गेट केलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सेनेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

मागील दिड महिन्यात तब्बल 513 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. शुक्रवारीच पुंछ सेक्टर भागात दोन मुलींसह चार लष्करी जवान गोळीबारीत जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही आक्रमक उत्तर देत आहेत. भारतीय सैन्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं सर्वाधिक नुकसान झालं असून त्यांच्याकडून सत्य लपवलं जात आहे. मात्र भारतीय लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे पाचपटीने अधिक नुकसान झालं आहे अशी माहिती लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी दिली. 

श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

पाकिस्तानच्या बालकोट भागात भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 4 जवानांसह 10 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 45 जण जखमी आहे. मात्र भारतीय लष्कराचे मनोबल वाढलेलं आहेत. जोपर्यंत सीमेवर भारतीय जवान तैनात आहेत तोवर देशातील नागरिकांनी कोणतीच चिंता बाळगू नका असं आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आलं आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची हत्यारं आणि विस्फोटक तयार आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. असा विश्वास लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी देशवासियांना दिला.    

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndian Armyभारतीय जवान