शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 10:19 IST

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं.

इस्लामाबाद: भारतात लोकसभेची निवडणूक होईपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहतील, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. निवडणूक होण्याआधी आणखी काहीतरी घडू शकतं, असा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीआधी पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवला जाईल, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवलं होतं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. याचाच संदर्भ देत भारत-पाकिस्तानवर अद्यापही युद्धाचं सावट  कायम असल्याचं खान म्हणाले. 'निवडणुकीआधी मोदी सरकार आणखी काहीतरी करू शकतं,' अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 'धोका अद्याप टळलेला नाही. भारतात निवडणूक होईपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहील. भारताकडून आक्रमण झाल्यास ते थोपवून धरण्यासाठी आम्ही तयार आहोत,' असं इम्रान खान यांनी म्हटलं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानातील बालाकोटवर बॉम्ब टाकले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानं ही धाडसी कारवाई केली. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र यामध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती हवाई दलानं दिली नाही. काँग्रेससह तृणमूल काँग्रेसनं या कारवाईचे पुरावे मागितल्यानं राजकारण तापलं होतं. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला