शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:56 IST

दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांनी दिली होती.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे मे २०२५ च्या प्रारंभी दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा होता. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दूरपर्यंत क्षेपणास्त्रे डागली. त्यातील एक क्षेपणास्त्र पाकिस्तानची पाताळयंत्री गुप्तचर संघटना आयएसआयच्या तळावर आदळले. पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना भारताची २ जेट विमाने पाडली आणि नियंत्रण रेषेवर तुफान तोफमारा करण्यात आला.

लोकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी योजनाकारांनी वाईटात वाईट घटनेला तोंड देण्याच्या दृष्टीने तयारी केली. मात्र, पडद्याच्या मागे काही वेगळेच घडत होते. पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय असलेल्या रावळपिंडीतील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळाले. भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांनी दिली होती.

पाकला दिलेले बेलआऊट पॅकेज हा शांतता कराराचा एक भाग

सीआयए आणि पेंटेंगॉनकडून अलर्ट मिळाल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संधी दिसून आली. परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना त्यांनी मागच्या दाराने चर्चा करण्यासाठी पाठविले. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या राजधान्यांशी वैयक्तिक संपर्कही कायम केला. भारताने आपली भूमिका कायम ठेवली.पाकिस्तानत्वा मात्र अमेरिकेने जबरदस्त वाकवले. कमजोर अर्थव्यवस्था, राजनैतिक एकाकीपणा आणि हस्तक्षेपास अनुच्छुक राहून मौन पसंत करणारा चीन यामुळे रावळपिंडी हतबल झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला दिलेले बेलआऊट पॅकेज हे शांतता कराराचाच एक भाग आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तान झुकले ते सद्भावनेमुळे नव्हे, तर खेळायला दुसरे कार्डच उरले नव्हते म्हणून..!

१० मे २०२५ रोजी पाकिस्तानच्या लष्करी मोहिमा महासंचालकांनी भारतीय महासंचालकांना फोन केला. 'आमची तणाव कमी करण्याची इच्छा आहे. शस्त्रसंधी करू या', असे त्यांनी शांतपणे सांगितले. त्याआधी मध्यरात्रीपासून अमेरिका पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी दटावत होताच.

भारताने पाक अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले, वॉशिंग्टनशी सल्लामसलत केली आणि दहशतवादाचा पाठिंबा तत्काळ थांबविण्याच्या अटीवर शस्त्रसंधीस मान्यता दिली. सूर्योदयापर्यंत शस्त्रसंधी अस्तित्वात आली.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाच्या आविर्भावात द्विट केले. जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, बंद कक्षात एक सत्य राहिले: पाकिस्तानी लष्कर झुकले ते स‌द्भावनेमुळे नव्हे, तर त्यांच्याकडे खेळायला कोणते कार्डच उरले नव्हते म्हणून.

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAmericaअमेरिकाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक