शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:56 IST

दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांनी दिली होती.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे मे २०२५ च्या प्रारंभी दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा होता. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दूरपर्यंत क्षेपणास्त्रे डागली. त्यातील एक क्षेपणास्त्र पाकिस्तानची पाताळयंत्री गुप्तचर संघटना आयएसआयच्या तळावर आदळले. पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना भारताची २ जेट विमाने पाडली आणि नियंत्रण रेषेवर तुफान तोफमारा करण्यात आला.

लोकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी योजनाकारांनी वाईटात वाईट घटनेला तोंड देण्याच्या दृष्टीने तयारी केली. मात्र, पडद्याच्या मागे काही वेगळेच घडत होते. पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय असलेल्या रावळपिंडीतील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळाले. भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांनी दिली होती.

पाकला दिलेले बेलआऊट पॅकेज हा शांतता कराराचा एक भाग

सीआयए आणि पेंटेंगॉनकडून अलर्ट मिळाल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संधी दिसून आली. परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना त्यांनी मागच्या दाराने चर्चा करण्यासाठी पाठविले. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या राजधान्यांशी वैयक्तिक संपर्कही कायम केला. भारताने आपली भूमिका कायम ठेवली.पाकिस्तानत्वा मात्र अमेरिकेने जबरदस्त वाकवले. कमजोर अर्थव्यवस्था, राजनैतिक एकाकीपणा आणि हस्तक्षेपास अनुच्छुक राहून मौन पसंत करणारा चीन यामुळे रावळपिंडी हतबल झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला दिलेले बेलआऊट पॅकेज हे शांतता कराराचाच एक भाग आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तान झुकले ते सद्भावनेमुळे नव्हे, तर खेळायला दुसरे कार्डच उरले नव्हते म्हणून..!

१० मे २०२५ रोजी पाकिस्तानच्या लष्करी मोहिमा महासंचालकांनी भारतीय महासंचालकांना फोन केला. 'आमची तणाव कमी करण्याची इच्छा आहे. शस्त्रसंधी करू या', असे त्यांनी शांतपणे सांगितले. त्याआधी मध्यरात्रीपासून अमेरिका पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी दटावत होताच.

भारताने पाक अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले, वॉशिंग्टनशी सल्लामसलत केली आणि दहशतवादाचा पाठिंबा तत्काळ थांबविण्याच्या अटीवर शस्त्रसंधीस मान्यता दिली. सूर्योदयापर्यंत शस्त्रसंधी अस्तित्वात आली.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाच्या आविर्भावात द्विट केले. जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, बंद कक्षात एक सत्य राहिले: पाकिस्तानी लष्कर झुकले ते स‌द्भावनेमुळे नव्हे, तर त्यांच्याकडे खेळायला कोणते कार्डच उरले नव्हते म्हणून.

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAmericaअमेरिकाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक