शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र, आमच्यासाठी नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 09:05 IST

B K Hariprasad Controversial Statement : पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र असू शकतं, मात्र काँग्रेस पाकिस्तानकडे केवळ एक शेजारील देश म्हणून पाहतो, असं विधान कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी केलं आहे.

कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानभाजपासाठी शत्रूराष्ट्र असू शकतं, मात्र काँग्रेस पाकिस्तानकडे केवळ एक शेजारील देश म्हणून पाहतो. हरिप्रसाद यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्याविरोधात देशविरोधी भावना भडकवल्याचा आरोप केला आहे. 

कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्याला उत्तर देताना हरिप्रसाद यांनी हे विधान केले आहे. विधान परिषदेमध्ये संबोधित करताना हरिप्रसाद म्हणाले की, भाजपावाले शत्रूराष्ट्रासोबत आमच्या संबंधांबाबत बोलतात. त्यांच्या मते पाकिस्तान एक शत्रूराष्ट्र आहे. मात्र आमच्यासाठी पाकिस्तान कुठलंही शत्रू राष्ट्र नाही आहे. तो केवळ एक शेजारील देश आहे. हल्लीच लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला. हेच अडवाणी जिन्ना यांच्या कबरीला भेट देण्यासाठी गेले होते. तसेच त्यांच्यासारखे कुणी धर्मनिरपेक्ष राष्ट्र नसल्याचे म्हणाले होते. तेव्हा पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र नव्हते का? असा सवालही हरिप्रसाद यांनी विचारला. 

कर्नाटक भाजपाने पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्र न म्हटल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली आहे. पाकिस्तानने भारताविरोधात चार युद्धं लढली आहेत. पाकिस्तानबाबत काँग्रेसचं काय मत आहे ते बी. के. हरिप्रसाद यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे. त्यांनी पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र आणि काँग्रेससाठी एक शेजारी असल्याचं सांगून नेहरू आणि जिन्ना यांच्यातील घनिष्ठ संबंध वर्तमान पिढीपर्यंत कामय असल्याचं दाखवून दिलं आहे, असा आरोप भाजपाने केला.  

मंगळवारी राज्यसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसचे उमेदवार नासिर हुसेन यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या असा आरोप करत त्याविरोधात भाजपाने कर्नाटक विधानसभेत आंदोलन केले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून हरिप्रसाद यांनी वरील वक्तव्य केले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणPakistanपाकिस्तानIndiaभारत