शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 4:37 PM

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत.

चंदीगड - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रकरणी पाकिस्तान एकटा पडल्याने पाक सैरभैर झाला आहे. त्यामुळे भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी पाकिस्तान नापाक कुरापती करत असल्याचं समोर येत आहे. 

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे सीमेवरील अनेक गावांमध्ये आजाराने थैमान घातलं आहे. पाकिस्तानकडून अचानक जास्तीचं पाणी सोडल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज नदी भारतात येण्यापूर्वी पंजाबच्या काही भागातून पाकिस्तानात जाते. त्यानंतर पुन्हा भारतात प्रवेश करते. पाकिस्तानने या सतलुज नदीत प्रदुषित पाणी सोडण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे हजारो भारतीय शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि आरोग्याची हानी होत आहे. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सतलुज नदीतील पाण्याची पातळी वाढल्याबद्दल परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी लष्करासोबत बैठक घेऊन नदीवरील तटबंध मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. फिरोजपूर जिल्ह्यातील गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. जीवघेणे आजारांनी गावकऱ्यांना त्रस्त केलं आहे. 

सीएम अमरिंदर सिंग यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. त्याचसोबत फिरोजपूर येथे एनडीआरएफ टीमला तैनात राहण्यास सांगितले आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टरांचे पथकही पूरग्रस्त भागात आहे. 

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जगभरातील कोणत्याही देशाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने पाकचा थयथयाट समोर येऊ लागला आहे. अथक प्रयत्नानंतरही चीन, तुर्कीसारखे देशही पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने हताश झालेला पाकने धर्माच्या नावावर जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला आहे. तसेच समझौता एक्सप्रेसही रद्द केली आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब