शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 09:11 IST

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव वाढला आहे.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील लष्कर अलर्टवर आहेत. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांचे एक विधान समोर आले आहे. बाबा रामदेव यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बाबा रामदेव म्हणाले की, पाकिस्तान आधीच अंतर्गत कलहाचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत जर युद्ध झाले तर पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टिकू शकणार नाही.

रामदेव बाबा यांनी कडक शब्दात पाकिस्तानला सुनावले. "येत्या काही दिवसांत आपण कराचीमध्ये गुरुकुल बांधणार त्यानंतर लाहोरमध्ये बांधणार. पाकिस्तान स्वतःहून तुटून पडेल, असंही बाबा रामदेव म्हणाले. 

India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर

बाबा रामदेव यांनी काल रविवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले की, पाकिस्तान स्वतःहून तुटून पडेल. बलुचिस्तानचे लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. या ठिकाणांची परिस्थिती पाकव्याप्त काश्मीर पेक्षाही वाईट आहे. पाकिस्तानकडे भारताशी लढण्याची ताकद नाही. ते युद्धात चार दिवस टिकू शकत नाही. मला वाटतं काही दिवसांत आपल्याला कराची आणि नंतर लाहोरमध्ये गुरुकुल स्थापन करावे लागेल.

भारत दहशतवादाच्या सूत्रधारांना धडा शिकवेल - भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही पाकिस्तानवर टीका केली. ते म्हणाले की, "पाकिस्तानने आपल्या सैन्यावरील विश्वास गमावला आहे. त्यांना प्रत्युत्तराची भीती वाटते. भारताने अद्याप पूर्ण प्रत्युत्तर दिलेले नाही. भारत दहशतवादाच्या सूत्रधारांचे तुकडे तुकडे करेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाच्या सूत्रधारांना धडा शिकवण्यास तयार आहे, असंही ते म्हणाले. 

 युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सीमेवर लष्कर अलर्टवर आहेत. दरम्यान, आता ईराण या दोन्ही देशात शांतता राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हे नवी दिल्ली भेटीपूर्वी सोमवारी इस्लामाबादच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर पाकिस्तानात जाणार आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अरघची यांची भेट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अरघची पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी एक महत्त्वाची बैठक घेतील. त्यांची चर्चा पाकिस्तान आणि इराणमधील द्विपक्षीय संबंधांवर तसेच सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीवर, विशेषतः अलीकडील पाकिस्तान-भारत तणावावर केंद्रित असणार आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPakistanपाकिस्तानIndiaभारत