शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:05 IST

१४ ऑगस्ट १९९३ रोजी पहिल्यांदा किश्तवाडमध्ये १७ हिंदू यात्रेकरूंना वेगळे करून केली होती हत्या

सुरेश डुग्गरजम्मू : पहलगाममधील बैसरन घाटीवर धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना नाही. याची सुरुवात ३२ वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी किश्तवाडच्या सरथल भागात एका प्रवासी बसमधून १७ हिंदूंना वेगळे करत त्यांची हत्या केली होती. जम्मू-काश्मीरमधील हा पहिला सर्वात मोठा नरसंहार होता. त्यामुळे दहशतवादी काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी लढत नव्हते तर ते धर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी तसेच आताही आलेले दहशतवादी दुसऱ्या देशाचेच होते.

किश्तवाड घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये धर्म तपासून हत्या करण्याची मालिका सुरू झाली. आजपर्यंत दहशतवाद्यांनी अनेक जणांची हत्या केली. या सर्व हत्याकांडांमध्ये एक-दोन वगळता हिंदूंनांच लक्ष्य केले गेले. २००६ नंतर अशा हत्या थांबल्या असल्या तरी १ जानेवारी २०२३ मध्ये राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दहशतवाद्यांनी सात हिंदूंची आधार कार्ड तपासल्यानंतर हत्या केल्याच्या घटनेने अधिकाऱ्यांना धक्का बसला. १३६ हत्यांमध्ये काश्मीरमधीलच लोकांना टार्गेट करण्यात आले होते. मात्र, आता संपूर्ण भारतातील लोकांना टार्गेट करण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

१९९३ पासून आतापर्यंत हिंदुंना टार्गेट करून मारल्याच्या प्रमुख घटना१३-१४ ऑगस्ट १९९३ किश्तवाड शहरातील सरथल-किश्तवाड रस्त्यावर एका प्रवासी बसमधून बाहेर काढून १७ हिंदू प्रवाशांची हत्या करण्यात आली.५ जानेवारी १९९६ किश्तवाड बरशाळा येथे येथे १६ हिंदूंची हत्या.६ मे १९९६ रामबन तहसीलच्या सुंबर गावात १७ हिंदूंची हत्या.२५ जून १९९६ डोडाच्या सियुधार भागात १३ जणांचा मृत्यू.२६ जानेवारी १९९८ काश्मीरमधील वंदहामा गावात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली.१७ एप्रिल १९९८ उधमपूरच्या प्राणकोट आणि धाकीकोट गावात २९ लोक मारले गेले.१९ जून १९९८ - डोडा येथे हिंदूंच्या लग्न सोहळ्यात २९ पाहुण्यांची हत्या. ३ नवरदेवांनाही मारले.२७ जुलै १९९८ किश्तवाडमधील छिन्हाठकुरायी आणि श्रवण गावात २० हिंदूंची हत्या.२९ जून १९९९ अनंतनागच्या संथू गावात १२ बिहारी कामगारांची हत्या करण्यात आली.२० मार्च २००० छत्तीसिंग पोरा येथे ३६ शिखांची हत्या.१ ऑगस्ट २००० - पहलगाममध्ये ३२ लोकांची हत्या. यात २९ अमरनाथ यात्रेकरूंचाही समावेश.४ ऑगस्ट २००१ डोडा जिल्ह्यातील किश्तवाड तहसीलच्या सरुतधार भागात १६ हिंदूंची हत्या.१४ मे २००२ जम्मूतील कालुचक येथे झालेल्या भयानक हत्याकांडात ३४ हिंदूंची हत्या करण्यात आली.१३ जुलै २००२  कासिमनगर येथे झालेल्या हत्याकांडात २९ जणांची हत्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण स्थलांतरित कामगार होते.६ ऑगस्ट २००२  नुनवान-पहलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंची हत्या, १० जण ठार.२३ मार्च २००३ - पुलवामा येथील छोपिया येथे दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली.३० एप्रिल २००६- उधमपूरच्या बसंतगडमध्ये सात हिंदूंची आणि डोडाच्या कुलहान भागात २२ हिंदूंची हत्या.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाहल्ल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगराळ भागांसह पर्यटनस्थळे सुरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. देशात अनेक पर्यटनस्थळे असे आहेत जेथे देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असतात. अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशात, पर्यटकांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अनेक राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाHinduहिंदू