शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:05 IST

१४ ऑगस्ट १९९३ रोजी पहिल्यांदा किश्तवाडमध्ये १७ हिंदू यात्रेकरूंना वेगळे करून केली होती हत्या

सुरेश डुग्गरजम्मू : पहलगाममधील बैसरन घाटीवर धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना नाही. याची सुरुवात ३२ वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी किश्तवाडच्या सरथल भागात एका प्रवासी बसमधून १७ हिंदूंना वेगळे करत त्यांची हत्या केली होती. जम्मू-काश्मीरमधील हा पहिला सर्वात मोठा नरसंहार होता. त्यामुळे दहशतवादी काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी लढत नव्हते तर ते धर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी तसेच आताही आलेले दहशतवादी दुसऱ्या देशाचेच होते.

किश्तवाड घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये धर्म तपासून हत्या करण्याची मालिका सुरू झाली. आजपर्यंत दहशतवाद्यांनी अनेक जणांची हत्या केली. या सर्व हत्याकांडांमध्ये एक-दोन वगळता हिंदूंनांच लक्ष्य केले गेले. २००६ नंतर अशा हत्या थांबल्या असल्या तरी १ जानेवारी २०२३ मध्ये राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दहशतवाद्यांनी सात हिंदूंची आधार कार्ड तपासल्यानंतर हत्या केल्याच्या घटनेने अधिकाऱ्यांना धक्का बसला. १३६ हत्यांमध्ये काश्मीरमधीलच लोकांना टार्गेट करण्यात आले होते. मात्र, आता संपूर्ण भारतातील लोकांना टार्गेट करण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

१९९३ पासून आतापर्यंत हिंदुंना टार्गेट करून मारल्याच्या प्रमुख घटना१३-१४ ऑगस्ट १९९३ किश्तवाड शहरातील सरथल-किश्तवाड रस्त्यावर एका प्रवासी बसमधून बाहेर काढून १७ हिंदू प्रवाशांची हत्या करण्यात आली.५ जानेवारी १९९६ किश्तवाड बरशाळा येथे येथे १६ हिंदूंची हत्या.६ मे १९९६ रामबन तहसीलच्या सुंबर गावात १७ हिंदूंची हत्या.२५ जून १९९६ डोडाच्या सियुधार भागात १३ जणांचा मृत्यू.२६ जानेवारी १९९८ काश्मीरमधील वंदहामा गावात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली.१७ एप्रिल १९९८ उधमपूरच्या प्राणकोट आणि धाकीकोट गावात २९ लोक मारले गेले.१९ जून १९९८ - डोडा येथे हिंदूंच्या लग्न सोहळ्यात २९ पाहुण्यांची हत्या. ३ नवरदेवांनाही मारले.२७ जुलै १९९८ किश्तवाडमधील छिन्हाठकुरायी आणि श्रवण गावात २० हिंदूंची हत्या.२९ जून १९९९ अनंतनागच्या संथू गावात १२ बिहारी कामगारांची हत्या करण्यात आली.२० मार्च २००० छत्तीसिंग पोरा येथे ३६ शिखांची हत्या.१ ऑगस्ट २००० - पहलगाममध्ये ३२ लोकांची हत्या. यात २९ अमरनाथ यात्रेकरूंचाही समावेश.४ ऑगस्ट २००१ डोडा जिल्ह्यातील किश्तवाड तहसीलच्या सरुतधार भागात १६ हिंदूंची हत्या.१४ मे २००२ जम्मूतील कालुचक येथे झालेल्या भयानक हत्याकांडात ३४ हिंदूंची हत्या करण्यात आली.१३ जुलै २००२  कासिमनगर येथे झालेल्या हत्याकांडात २९ जणांची हत्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण स्थलांतरित कामगार होते.६ ऑगस्ट २००२  नुनवान-पहलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंची हत्या, १० जण ठार.२३ मार्च २००३ - पुलवामा येथील छोपिया येथे दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली.३० एप्रिल २००६- उधमपूरच्या बसंतगडमध्ये सात हिंदूंची आणि डोडाच्या कुलहान भागात २२ हिंदूंची हत्या.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाहल्ल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगराळ भागांसह पर्यटनस्थळे सुरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. देशात अनेक पर्यटनस्थळे असे आहेत जेथे देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असतात. अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशात, पर्यटकांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अनेक राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाHinduहिंदू