शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:05 IST

१४ ऑगस्ट १९९३ रोजी पहिल्यांदा किश्तवाडमध्ये १७ हिंदू यात्रेकरूंना वेगळे करून केली होती हत्या

सुरेश डुग्गरजम्मू : पहलगाममधील बैसरन घाटीवर धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना नाही. याची सुरुवात ३२ वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी किश्तवाडच्या सरथल भागात एका प्रवासी बसमधून १७ हिंदूंना वेगळे करत त्यांची हत्या केली होती. जम्मू-काश्मीरमधील हा पहिला सर्वात मोठा नरसंहार होता. त्यामुळे दहशतवादी काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी लढत नव्हते तर ते धर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी तसेच आताही आलेले दहशतवादी दुसऱ्या देशाचेच होते.

किश्तवाड घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये धर्म तपासून हत्या करण्याची मालिका सुरू झाली. आजपर्यंत दहशतवाद्यांनी अनेक जणांची हत्या केली. या सर्व हत्याकांडांमध्ये एक-दोन वगळता हिंदूंनांच लक्ष्य केले गेले. २००६ नंतर अशा हत्या थांबल्या असल्या तरी १ जानेवारी २०२३ मध्ये राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दहशतवाद्यांनी सात हिंदूंची आधार कार्ड तपासल्यानंतर हत्या केल्याच्या घटनेने अधिकाऱ्यांना धक्का बसला. १३६ हत्यांमध्ये काश्मीरमधीलच लोकांना टार्गेट करण्यात आले होते. मात्र, आता संपूर्ण भारतातील लोकांना टार्गेट करण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

१९९३ पासून आतापर्यंत हिंदुंना टार्गेट करून मारल्याच्या प्रमुख घटना१३-१४ ऑगस्ट १९९३ किश्तवाड शहरातील सरथल-किश्तवाड रस्त्यावर एका प्रवासी बसमधून बाहेर काढून १७ हिंदू प्रवाशांची हत्या करण्यात आली.५ जानेवारी १९९६ किश्तवाड बरशाळा येथे येथे १६ हिंदूंची हत्या.६ मे १९९६ रामबन तहसीलच्या सुंबर गावात १७ हिंदूंची हत्या.२५ जून १९९६ डोडाच्या सियुधार भागात १३ जणांचा मृत्यू.२६ जानेवारी १९९८ काश्मीरमधील वंदहामा गावात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली.१७ एप्रिल १९९८ उधमपूरच्या प्राणकोट आणि धाकीकोट गावात २९ लोक मारले गेले.१९ जून १९९८ - डोडा येथे हिंदूंच्या लग्न सोहळ्यात २९ पाहुण्यांची हत्या. ३ नवरदेवांनाही मारले.२७ जुलै १९९८ किश्तवाडमधील छिन्हाठकुरायी आणि श्रवण गावात २० हिंदूंची हत्या.२९ जून १९९९ अनंतनागच्या संथू गावात १२ बिहारी कामगारांची हत्या करण्यात आली.२० मार्च २००० छत्तीसिंग पोरा येथे ३६ शिखांची हत्या.१ ऑगस्ट २००० - पहलगाममध्ये ३२ लोकांची हत्या. यात २९ अमरनाथ यात्रेकरूंचाही समावेश.४ ऑगस्ट २००१ डोडा जिल्ह्यातील किश्तवाड तहसीलच्या सरुतधार भागात १६ हिंदूंची हत्या.१४ मे २००२ जम्मूतील कालुचक येथे झालेल्या भयानक हत्याकांडात ३४ हिंदूंची हत्या करण्यात आली.१३ जुलै २००२  कासिमनगर येथे झालेल्या हत्याकांडात २९ जणांची हत्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण स्थलांतरित कामगार होते.६ ऑगस्ट २००२  नुनवान-पहलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंची हत्या, १० जण ठार.२३ मार्च २००३ - पुलवामा येथील छोपिया येथे दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली.३० एप्रिल २००६- उधमपूरच्या बसंतगडमध्ये सात हिंदूंची आणि डोडाच्या कुलहान भागात २२ हिंदूंची हत्या.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाहल्ल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगराळ भागांसह पर्यटनस्थळे सुरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. देशात अनेक पर्यटनस्थळे असे आहेत जेथे देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असतात. अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशात, पर्यटकांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अनेक राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाHinduहिंदू