शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 10:47 IST

भारत सरकारच्या या आदेशानंतर सर्वात जास्त चर्चा पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची होत आहे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर कायदेशीवर स्ट्राईक लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानविरोधात ५ मोठे निर्णय घेण्यात आलेत. त्यात भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिलेत. जे व्हिसा धारक आहेत त्यांना १ मे पर्यंत पाकिस्तानात जाता येणार आहे.

भारत सरकारच्या या आदेशानंतर सर्वात जास्त चर्चा पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची होत आहे. सीमा हैदर भारतीय नागरिक सचिन मीणाच्या प्रेमात पडून पाकिस्तानसोडून भारतात आली होती. इथे तिने सचिनसोबत लग्न केले. आता भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात परतावं लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

नेपाळमार्गे भारतात आली होती 

सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. सर्वात आधी ती पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानच्या शारजहातून नेपाळला पोहचली. नेपाळमध्ये काही दिवस घालवल्यानंतर काठमांडू टू दिल्ली बसमध्ये प्रवास करत ती चार मुलांसह भारतात पोहचली. याठिकाणी सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले तेव्हापासून सीमा हैदर भारतात राहत आहे. सीमा आणि सचिन यांची याआधी यूपी एटीएसने चौकशी केली आहे.

सीमाला परत जावं लागणार?

पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर सीमा हैदरलाही परत जावे लागणार का हे येणाऱ्या काळात कळेल. सीमा हैदर भारतात कुठल्याही व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पोहचली होती. तिचे प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिक सचिन मीणासोबत लग्न केले आहे. जर यूपी सरकार या प्रकरणी सीमा हैदरविरोधात गुन्हा दाखल करून तिला विना व्हिसा, पासपोर्ट भारतात आल्याबद्दल शिक्षा होऊ शकते अथवा तिला पुन्हा पाकिस्तानात सोडले जाऊ शकते. सीमा हैदरने भारतीय नागरिकत्व मिळावे अशी मागणीही केली आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

दिल्ली हायकोर्टाचे वकील अबू बकर यांनी सांगितले की, सर्व पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही स्थितीत भारत सोडावा लागेल. त्यामुळे सीमा हैदरलाही भारतातून जावे लागेल. परंतु हे करणे सोपे नाही. सीमा हैदरला भारतात राहण्याची परवानगी द्यायची की नाही हे राज्य सरकारवर अवलंबून आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे. सचिन मीणाशी लग्न करून तिला १ मुलगाही झाला आहे. त्यामुळे यूपी सरकारच्या रिपोर्टवर सीमा हैदरवर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होईल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला