सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. त्यांनी १५ दिवसांच्या आतच काँग्रेसला धोका दिला. पत्नीसाठीचा मोह त्यांना आवरता आला नसून काँग्रेसमध्ये सामील झालेले सिन्हा बायकोसाठी समाजवादी पक्षाच्या रॅलीत सामील झाल्याचे पांडे यांनी म्हटले. ...
रविंद्र कुशवाहा हे आपल्या मतदारसंघात प्रचाराला गेले असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागले. मागील पाच वर्षांत तुम्ही किती काम केले असा जाब नागरिकांनी विचारला. नागरिकाचा रोष लक्षात घेत कुशवाहा यांनी गाडीतून न उतरताच परतावे लागले. ...
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण राजकीय रंगात रंगून गेले आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आता राजकीय वारे वाहू लागले आहे. ...
बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. ...
दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. ...
काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. ...