शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साठी ओलांडलेल्यांचा काळ संपला

By admin | Updated: October 18, 2015 22:21 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील वर्षी मार्च वा त्याआधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हा ते आपल्यासोबत नवी टीम घेऊन येतील.

हैदराबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील वर्षी मार्च वा त्याआधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हा ते आपल्यासोबत नवी टीम घेऊन येतील. या नव्या व्यवस्थेत साठी ओलांडलेले पक्षनेते केवळ सल्लागाराची भूमिका साकारताना दिसतील, असे संकेत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी दिले.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रमेश बोलत होते. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याचा सल्ला देत, पक्षातील परिर्वतनाची प्रक्रिया सहज असेल, यावर रमेश यांनी भर दिला. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील, तेव्हा ज्येष्ठ नेत्यांना सन्मानपूर्वकच वागणूक मिळेल. मोदींनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जे काही केले, तसे राहुल गांधी करतील, असे मला अजिबात वाटत नाही. मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह या प्रत्येकाला ‘सायबेरिया’ला पाठवून दिले; पण राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्रे आपल्या हातात घेतल्यास ती सूत्रे कुण्या एका व्यक्तीच्या हाती नसतील, तर एक संपूर्ण टीम तिथे असेल. त्याचमुळे ही टीम निवडण्यासाठी राहुल अधिक वेळ घेत आहेत. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना एक सक्षम टीम हवी आहे आणि ती उभी करण्यासाठी, ते वेळ घेत आहेत, असे रमेश म्हणाले.या वर्षाच्या प्रारंभी रमेश यांनी राहुल गांधी २०१५ मध्ये अध्यक्षपद सांभाळतील, असे संकेत दिले होते. मात्र, आता राहुल गांधी टीमची बांधणी करण्यात गुंतले असल्याचे ते म्हणत आहेत.राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रे कधी स्वीकारणार? असे विचारले असता, २०१५ अद्याप संपलेले नाही. कदाचित मार्चपर्यंत हे होईल, असे ते म्हणाले. अर्थात, निश्चित वेळ केवळ सोनिया गांधी आणि स्वत: राहुल गांधी या दोनच व्यक्ती सांगू शकतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावरील नेतृत्व बदल म्हणजे निश्चितपणे एका पिढीचा बदल असतो. १९८४ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा हेच दिसले होते. येत्या काळात काँग्रेसमध्ये तीस व चाळिशीतील नेत्यांना मुख्य भूमिकेत आणावे लागेल. साठी ओलांडलेल्या नेत्यांना काळ आता संपलेला आहे; पण त्यांच्याही अनुभवाचा लाभ घेतला जाईल. त्यांनी स्वत:हून स्वत:चा अनुभव, ज्ञान दिले पाहिजे; पण सत्तरीनंतरच्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला गेला पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.