शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

श्वास गुदमरतोय! भारतात वायू प्रदूषणामुळे एकाच वर्षात 12 लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 14:50 IST

वायू प्रदूषणाचा भारत आणि चीनला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली: वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका भारत आणि चीनला बसत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांनी जीव गमावला. त्यातील निम्मे मृत्यूभारत आणि चीनमध्ये झाले आहेत. अमेरिकेतील न्यू ग्लोबल स्टडी आणि स्टेट ऑफ ग्लोबल स्टडी या संस्थांनी वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या जीवितहानीची आकडेवारी प्रसिद्ध केली. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांचा प्राण गेला. यातील जवळपास 12 लाख लोक भारताचे आहेत. भारत आणि चीनमधील प्रत्येकी 12 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी अहवालात आहे. यामध्ये घरात होत असलेल्या वायू प्रदूषणाचादेखील समावेश आहे. दक्षिण आशियातील वायू प्रदूषणाचं संकट अतिशय भीषण असल्याचं अहवाल सांगतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्म घेत असलेल्या मुलांचं सरासरी आयुष्य दीड वर्षांनी कमी होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. 

वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा वाढतच असल्याचं वास्तव अहवालातून अधोरेखित झालं आहे. 2016 मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हेच प्रमाण 12 लाखांवर गेलं आहे. दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राममधील परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचं अहवाल सांगतो. देशातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्यास त्यात वायू प्रदूषणाचा तिसरा क्रमांक लागतो. कुपोषण, मद्यसेवन आणि शारीरिक निष्क्रियतेपेक्षा अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणDeathमृत्यूchinaचीनIndiaभारत