शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

श्वास गुदमरतोय! भारतात वायू प्रदूषणामुळे एकाच वर्षात 12 लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 14:50 IST

वायू प्रदूषणाचा भारत आणि चीनला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली: वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका भारत आणि चीनला बसत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांनी जीव गमावला. त्यातील निम्मे मृत्यूभारत आणि चीनमध्ये झाले आहेत. अमेरिकेतील न्यू ग्लोबल स्टडी आणि स्टेट ऑफ ग्लोबल स्टडी या संस्थांनी वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या जीवितहानीची आकडेवारी प्रसिद्ध केली. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांचा प्राण गेला. यातील जवळपास 12 लाख लोक भारताचे आहेत. भारत आणि चीनमधील प्रत्येकी 12 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी अहवालात आहे. यामध्ये घरात होत असलेल्या वायू प्रदूषणाचादेखील समावेश आहे. दक्षिण आशियातील वायू प्रदूषणाचं संकट अतिशय भीषण असल्याचं अहवाल सांगतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्म घेत असलेल्या मुलांचं सरासरी आयुष्य दीड वर्षांनी कमी होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. 

वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा वाढतच असल्याचं वास्तव अहवालातून अधोरेखित झालं आहे. 2016 मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हेच प्रमाण 12 लाखांवर गेलं आहे. दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राममधील परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचं अहवाल सांगतो. देशातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्यास त्यात वायू प्रदूषणाचा तिसरा क्रमांक लागतो. कुपोषण, मद्यसेवन आणि शारीरिक निष्क्रियतेपेक्षा अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणDeathमृत्यूchinaचीनIndiaभारत