शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

श्वास गुदमरतोय! भारतात वायू प्रदूषणामुळे एकाच वर्षात 12 लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 14:50 IST

वायू प्रदूषणाचा भारत आणि चीनला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली: वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका भारत आणि चीनला बसत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांनी जीव गमावला. त्यातील निम्मे मृत्यूभारत आणि चीनमध्ये झाले आहेत. अमेरिकेतील न्यू ग्लोबल स्टडी आणि स्टेट ऑफ ग्लोबल स्टडी या संस्थांनी वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या जीवितहानीची आकडेवारी प्रसिद्ध केली. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांचा प्राण गेला. यातील जवळपास 12 लाख लोक भारताचे आहेत. भारत आणि चीनमधील प्रत्येकी 12 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी अहवालात आहे. यामध्ये घरात होत असलेल्या वायू प्रदूषणाचादेखील समावेश आहे. दक्षिण आशियातील वायू प्रदूषणाचं संकट अतिशय भीषण असल्याचं अहवाल सांगतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्म घेत असलेल्या मुलांचं सरासरी आयुष्य दीड वर्षांनी कमी होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. 

वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा वाढतच असल्याचं वास्तव अहवालातून अधोरेखित झालं आहे. 2016 मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हेच प्रमाण 12 लाखांवर गेलं आहे. दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राममधील परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचं अहवाल सांगतो. देशातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्यास त्यात वायू प्रदूषणाचा तिसरा क्रमांक लागतो. कुपोषण, मद्यसेवन आणि शारीरिक निष्क्रियतेपेक्षा अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणDeathमृत्यूchinaचीनIndiaभारत