शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सीएपीएफ आणि आसाम रायफलमध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त, केंद्राने माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:02 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती.

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये लाखो पदं रिक्त आहेत. यासंदर्भात खुद्द केंद्र सरकारनं   राज्यसभेत माहिती दिली आहे. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त असल्याचं बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती.

रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे,असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नित्यानंद राय म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये  71,231 नवीन पदं भरण्यात आली आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदं ही सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती, मृत्यू, नवीन बटालियनची स्थापना, नवीन पदांची निर्मिती इत्यादी कारणांमुळे आहेत. ती भरणं ही निरंतर प्रक्रिया आहे.

आकडेवारीवरून असे दिसून आले की, 30 ऑक्टोबरपर्यंत  1,00,204 पदं रिक्त आहेत, ज्यात सीएपीएफमध्ये 33,730, सीआयएसएफमध्ये 31,782, बीएसएफमध्ये 12,808, आयटीबीपीमध्ये 9,861, एसएसबीमध्ये 8,646 आणि आसाम रायफल्समध्ये 33,730 पदं आहेत. दरम्यान, मंत्री नित्यानंद राय म्हणाले, यूपीएससी, एसएससी आणि संबंधित दलांद्वारे पदे त्वरीत भरण्यासाठी मंत्रालय गंभीर पावलं उचलत आहे. तसेच, भरतीला गती देण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करणं, कॉन्स्टेबल-जीडीसाठी उमेदवारांच्या शॉर्टलिस्टसाठी कट-ऑफ गुण कमी करणं, जेणेकरुन पुरेसे उमेदवार निवडले जातील, अशी अनेक पावलं सरकारनं उचलली आहेत.

याचबरोबर, सरकारनं सीपीएएफ कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाला महत्त्व दिल्याचं मंत्री नित्यानंद राय यांनी एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ते म्हणाले, या उद्देशाने सीपीएएफ कर्मचाऱ्यांनी त्यांचं जीवन संतुलन सुधारण्यासाठी वर्षातील 100 दिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवावेत, यासाठी मंत्रालयानं सतत प्रयत्न केले आहेत. दरम्यान, नित्यानंद राय यांनी दिलेल्या आकडेवरीवरून असे दिसून आले आहे की, 2020 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान, 42,797 सीएपीएफ आणि आसाम रायफल्स कर्मचाऱ्यांनी एका वर्षात 100 दिवसांची रजा घेतली आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरीRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद