शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सीएपीएफ आणि आसाम रायफलमध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त, केंद्राने माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:02 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती.

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये लाखो पदं रिक्त आहेत. यासंदर्भात खुद्द केंद्र सरकारनं   राज्यसभेत माहिती दिली आहे. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त असल्याचं बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती.

रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे,असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नित्यानंद राय म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये  71,231 नवीन पदं भरण्यात आली आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदं ही सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती, मृत्यू, नवीन बटालियनची स्थापना, नवीन पदांची निर्मिती इत्यादी कारणांमुळे आहेत. ती भरणं ही निरंतर प्रक्रिया आहे.

आकडेवारीवरून असे दिसून आले की, 30 ऑक्टोबरपर्यंत  1,00,204 पदं रिक्त आहेत, ज्यात सीएपीएफमध्ये 33,730, सीआयएसएफमध्ये 31,782, बीएसएफमध्ये 12,808, आयटीबीपीमध्ये 9,861, एसएसबीमध्ये 8,646 आणि आसाम रायफल्समध्ये 33,730 पदं आहेत. दरम्यान, मंत्री नित्यानंद राय म्हणाले, यूपीएससी, एसएससी आणि संबंधित दलांद्वारे पदे त्वरीत भरण्यासाठी मंत्रालय गंभीर पावलं उचलत आहे. तसेच, भरतीला गती देण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करणं, कॉन्स्टेबल-जीडीसाठी उमेदवारांच्या शॉर्टलिस्टसाठी कट-ऑफ गुण कमी करणं, जेणेकरुन पुरेसे उमेदवार निवडले जातील, अशी अनेक पावलं सरकारनं उचलली आहेत.

याचबरोबर, सरकारनं सीपीएएफ कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाला महत्त्व दिल्याचं मंत्री नित्यानंद राय यांनी एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ते म्हणाले, या उद्देशाने सीपीएएफ कर्मचाऱ्यांनी त्यांचं जीवन संतुलन सुधारण्यासाठी वर्षातील 100 दिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवावेत, यासाठी मंत्रालयानं सतत प्रयत्न केले आहेत. दरम्यान, नित्यानंद राय यांनी दिलेल्या आकडेवरीवरून असे दिसून आले आहे की, 2020 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान, 42,797 सीएपीएफ आणि आसाम रायफल्स कर्मचाऱ्यांनी एका वर्षात 100 दिवसांची रजा घेतली आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरीRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद