शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

रेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार विमानाने प्रवास करण्याचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 9:59 AM

अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे

ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसने प्रवास करताना एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर विमानाने प्रवास करण्याचा पर्यायट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागणारअश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता

नवी दिल्ली - जर तुम्ही राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत असाल, आणि एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याचा पर्याय मिळू शकतो. पण ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे. 

रेल्वेमध्ये मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा फरक असल्या कारणाने कन्फर्म तिकीट न मिळणा-या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे एअर इंडियाचे चेअरमन असताना अश्वनी लोहानी यांनी ही संकल्पना समोर मांडली होती. त्यानुसार जर रेल्वेने अशा प्रवाशांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स एअर इंडियासोबत शेअर केल्यास त्यांनी विमानातून प्रवास करण्याची ऑफर दिली जाऊ शकते. यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. अश्वनी लोहानी यांनी सांगितल्यानुसार, 'राजधानीच्या एसी-2 च्या भाड्यात आणि विमानाच्या तिकीट दरात जास्त अंतर नाही'.

दरम्यान, दुसरीकडे सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न असून खासगी कंपनीला विकणार असल्याची माहिती आहे. प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत एअर इंडिया पुन्हा रेल्वेसमोर हा प्रस्ताव ठेवते का हे पाहावं लागेल. 

एअर इंडियाशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी एअरलाईन असल्याचा हा फायदा असून, रेल्वे आपल्या कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना आमच्याकडे पाठवू शकतात. अश्वनी लोहानी यांची ही संकल्पना खरंच चांगली आहे. मात्र रेल्व एका खासगी एअरलाइनसोबत असं करु शकेल का ? त्यांच्यावर खासगी कंपनीला फायदा पोहोचवण्याचा आरोप करण्यात येईल'.

अश्वनी लोहानी यांना रेल्वे बोर्डाचं चेअरमन करण्यात आल्यानंतर, एअर इंडियाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणा-या वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव बन्सल यांनी आपण या प्रस्तावावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचं सांगितलं आहे. 'मी पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकत आहे. ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात फरक असतो'. 

 

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसAirportविमानतळ