शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
4
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
5
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
6
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
7
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
8
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
9
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
10
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
11
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
12
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
13
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
14
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
15
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
16
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
17
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
18
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
19
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
20
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:02 IST

गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Congress AICC Session 2025: गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पूर्ण देशाला विकून निघून जाणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. त्यांच्या सरकारने  खाणकामापासून विमानतळांपर्यंत सर्व काही उद्योगपती मित्रांच्या हाती सोपवले असल्याचेही खरगे म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमचाही मुद्दा उपस्थित केला.

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनात मंगळवारी पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची चार तास बैठक चालली. आज साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत असलेल्या मुख्य अधिवेशनात देशभरातील १७०० हून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी झालेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल अधिवेशनात उपस्थित आहेत. भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

"जर परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस येईल जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील. मी हे स्पष्टपणे सांगत आहे. विमानतळ असो, खाणकाम असो, मीडिया हाऊस असो किंवा टेलिकॉम असो, हे सरकार ते आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहे. यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"सरकारने असे तंत्रज्ञान विकसित केले की ज्याचा त्यांना फायदा देईल आणि विरोधकांना नुकसान. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात. महाराष्ट्राच्या निवडणुकाही फसवणूक करुन जिंकल्या गेल्या. महाराष्ट्रात १५० जागा लढल्या गेल्या आणि १३८ जागा जिंकल्या गेल्या, म्हणजेच ९० टक्के विजय. हे आधी कधीही पाहिले नव्हते. चोर चोरी करतो. पण आज नाही तर उद्या पकडला जाईल म्हणून सर्व काही उघडकीस येईल," असेही खरगे म्हणाले.

"११ वर्षांत, विरोध करणाऱ्या राज्यांना सावत्र वागणूक देण्यात आली. केंद्र-राज्य संबंध इतके चांगले होते की कोणीही कधीही येऊन काहीही मागू शकत होते. पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये जे काही बजेटमध्ये जाहीर ते कधीच देत नाहीत. आमचे मुख्यमंत्री नरेगासाठी निधीची मागणी करत आहेत, पण मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही कारण त्यांचे मित्र श्रीमंत आहेत, जो श्रीमंतांचा मित्र आहे तो गरिबांचा मित्र होऊ शकत नाही," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी