शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:02 IST

गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Congress AICC Session 2025: गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पूर्ण देशाला विकून निघून जाणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. त्यांच्या सरकारने  खाणकामापासून विमानतळांपर्यंत सर्व काही उद्योगपती मित्रांच्या हाती सोपवले असल्याचेही खरगे म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमचाही मुद्दा उपस्थित केला.

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनात मंगळवारी पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची चार तास बैठक चालली. आज साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत असलेल्या मुख्य अधिवेशनात देशभरातील १७०० हून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी झालेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल अधिवेशनात उपस्थित आहेत. भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

"जर परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस येईल जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील. मी हे स्पष्टपणे सांगत आहे. विमानतळ असो, खाणकाम असो, मीडिया हाऊस असो किंवा टेलिकॉम असो, हे सरकार ते आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहे. यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"सरकारने असे तंत्रज्ञान विकसित केले की ज्याचा त्यांना फायदा देईल आणि विरोधकांना नुकसान. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात. महाराष्ट्राच्या निवडणुकाही फसवणूक करुन जिंकल्या गेल्या. महाराष्ट्रात १५० जागा लढल्या गेल्या आणि १३८ जागा जिंकल्या गेल्या, म्हणजेच ९० टक्के विजय. हे आधी कधीही पाहिले नव्हते. चोर चोरी करतो. पण आज नाही तर उद्या पकडला जाईल म्हणून सर्व काही उघडकीस येईल," असेही खरगे म्हणाले.

"११ वर्षांत, विरोध करणाऱ्या राज्यांना सावत्र वागणूक देण्यात आली. केंद्र-राज्य संबंध इतके चांगले होते की कोणीही कधीही येऊन काहीही मागू शकत होते. पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये जे काही बजेटमध्ये जाहीर ते कधीच देत नाहीत. आमचे मुख्यमंत्री नरेगासाठी निधीची मागणी करत आहेत, पण मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही कारण त्यांचे मित्र श्रीमंत आहेत, जो श्रीमंतांचा मित्र आहे तो गरिबांचा मित्र होऊ शकत नाही," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी