शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:02 IST

गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Congress AICC Session 2025: गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पूर्ण देशाला विकून निघून जाणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. त्यांच्या सरकारने  खाणकामापासून विमानतळांपर्यंत सर्व काही उद्योगपती मित्रांच्या हाती सोपवले असल्याचेही खरगे म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमचाही मुद्दा उपस्थित केला.

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनात मंगळवारी पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची चार तास बैठक चालली. आज साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत असलेल्या मुख्य अधिवेशनात देशभरातील १७०० हून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी झालेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल अधिवेशनात उपस्थित आहेत. भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

"जर परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस येईल जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील. मी हे स्पष्टपणे सांगत आहे. विमानतळ असो, खाणकाम असो, मीडिया हाऊस असो किंवा टेलिकॉम असो, हे सरकार ते आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहे. यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"सरकारने असे तंत्रज्ञान विकसित केले की ज्याचा त्यांना फायदा देईल आणि विरोधकांना नुकसान. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात. महाराष्ट्राच्या निवडणुकाही फसवणूक करुन जिंकल्या गेल्या. महाराष्ट्रात १५० जागा लढल्या गेल्या आणि १३८ जागा जिंकल्या गेल्या, म्हणजेच ९० टक्के विजय. हे आधी कधीही पाहिले नव्हते. चोर चोरी करतो. पण आज नाही तर उद्या पकडला जाईल म्हणून सर्व काही उघडकीस येईल," असेही खरगे म्हणाले.

"११ वर्षांत, विरोध करणाऱ्या राज्यांना सावत्र वागणूक देण्यात आली. केंद्र-राज्य संबंध इतके चांगले होते की कोणीही कधीही येऊन काहीही मागू शकत होते. पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये जे काही बजेटमध्ये जाहीर ते कधीच देत नाहीत. आमचे मुख्यमंत्री नरेगासाठी निधीची मागणी करत आहेत, पण मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही कारण त्यांचे मित्र श्रीमंत आहेत, जो श्रीमंतांचा मित्र आहे तो गरिबांचा मित्र होऊ शकत नाही," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी