शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

फोन टॅपिंगवरून गदारोळ; राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्र्यांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 04:38 IST

पेगॅससद्वारे केलेल्या पाळतीशी संबंधिक सर्व कागदपत्रे जनतेसाठी खुली करावीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, विरोधी पक्षांतील अन्य काही नेते, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, अश्विनी वैष्णव व प्रल्हाद पटेल हे दोन केंद्रीय मंत्री, न्यायाधीश, पत्रकार यांच्यासहित अनेक मान्यवरांचे फोन टॅप करून त्यांच्यावर मोदी सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी गदारोळ केला. भाजप ही भारतीय जाजूस पार्टी असल्याची टीका काँग्रेसने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र इस्रायली स्पायवेअर पेगॅससद्वारे पाळत ठेवल्याच्या आरोपांचा केंद्र सरकारने इन्कार केला आहे. या प्रकरणावरून संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. 

पेगॅससद्वारे केलेल्या पाळतीशी संबंधिक सर्व कागदपत्रे जनतेसाठी खुली करावीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खरगे व लोकसभा सदस्य अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, इस्रायलची कंपनी एनएसओने  पेगॅसस हे स्पायवेअर तयार केले असून ते फक्त विविध देशांच्या सरकारांनाच विकण्यात येते. मात्र केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आम्ही कोणाचेही फोन हँक केलेले नाहीत, असे सांगून विरोधकांचे आरोप फेटाळले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, १२० लोकांचे फोन हँक करण्यात आल्याची माहिती मिळाली असल्याचे तत्कालीन केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये म्हटले होते.

सरकारलाही बाजू मांडण्याची संधी द्या

सर्व विषयांवरील टोकदार प्रश्न विरोधी पक्षांनी अधिवेशनात सरकारला जरूर विचारावेत. मात्र सभागृहात विरोधकांनी कोणताही गदारोळ न माजविल्यास सरकार यांची उत्तरे व्यवस्थितपणे देऊ शकेल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. 

- लोकसभेत नव्या सदस्यांचा शपथविधीनंतर प्रथेनुसार पंतप्रधान माेदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इंधनाच्या वाढलेल्या किमती तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. 

- अनेक सदस्य फलके घेऊन लोकसभाध्यक्षांच्या आसनापुढे आले. या गोंधळात मोदींना मंत्र्यांचा परिचय करता आला नाही. शेवटी विरोधकांवर ताशेरे ओढत मोदींनी नवीन मंत्र्यांची यादी पटलावर ठेवली. ती अध्यक्षांनी मान्य केली.

- अनेक महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची बातमी एका वेब पोर्टलने संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी प्रसिद्ध केली. हा योगायोग असू शकत नाही, असा दावा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोणावरही पाळत ठेवलेली नाही असेही त्यांनी संसदेत सांगितले. 

- अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या व्हॉट्सअॅप संदेशांवर पेगॅससच्या माध्यमांतून नजर ठेवल्याचे आरोप याआधी झाले होते. पण ते बिनबुडाचे ठरले होते. भारतीय लोकशाही व येथील यंत्रणांची बदनामी करण्यासाठी पुन्हा तशाच पद्धतीने आरोप करण्यात आले आहेत, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.

राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक मात्र एकाच जागेवर

राज्यसभेच्या सध्या १४ जागा रिक्त आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने केवळ एकाच जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे सर्वच पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह इतर काही राज्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेसाठी आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी