शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:19 PM

लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. सोशल मीडिया, एसएमएस, फोन आदींवरून राजकीय पक्षांनी प्रचार केला. याचबरोबर निवडणूक आयोगानेही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एवढे करूनही २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाल्याने निवडणूक आयोग चिंतेत आला आहे. राजकीय पक्षांची धाकधूक वाढलेली असताना आयोगाने उरलेल्या टप्प्यांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन तयारी सुरु केली आहे. 

या लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी लोकांमध्ये उत्साह होता, परंतु ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करतील एवढा नव्हता, असे आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. मतदान वाढविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. स्वीप कार्यक्रमानुसार मतदान वाढविण्याची मोहिम आखण्यात आली आहे. प्रसिद्ध व्यक्तींना निवडणूक आयोगाचा दूत बनवून लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांनाही चांगले बनविण्यात आले आहे. परंतु असे वाटतेय की हे प्रयत्न पुरेसे नसतात, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

कमी मतदाना का झाले, याची चौकशी निवडणूक आयोग करत आहे. यामागे काही कारणेही आयोगाच्या लक्षात आली आहेत. या आठवड्याच्या अखेरीस असलेल्या बैठकांमध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. मतदान कमी होण्यामागे उष्णता हे देखील एक कारण असू शकते, असे सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. यावेळी २०१९ च्या तुलनेत ८ दिवस उशिराने निवडणूक सुरु झाली आहे. तसेच मतदानाच्या पूर्वीच काही संस्था, चॅनेल्स कल कोणाकडे आहे हे दाखवितात यामुळे देखील मतदारांमध्ये मतदानाविषयी उदासिनता दिसत आहे. तसेच लग्नसमारंभ, हवामान आदी देखील कारणीभूत असल्याचे आयोगाला वाटत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग