शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:07 IST

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर युद्धविराम कुणी केला, याबाबत मोठं विधान केलं आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या कारवाईदरम्यान, भारतीय सैन्यदलांनी सुरुवातीला  पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्यदलांनी केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही हवाई तळांना लक्ष्य करत मोठं नुकसान केलं होतं. मात्र दोन्ही देशांमधील संघर्ष अगदी टीपेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याची  घोषणा केली होती. मात्र भारताने दोन्ही देशांच्या सैन्यदलांच्या डीजीएमओंनी युद्धविरामावर सहमती दर्शवल्याचे सांगितले होते. तरीही भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर युद्धविराम कुणी केला, याबाबत मोठं विधान केलं आहे.

याबाबत एस. जयशंकर म्हणाले की, त्यावेळी जे काही घडले, त्याच्या नोंदी अगदी सुस्पष्ट आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविराम हा दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर करण्यात आला होता. यावेळी अमेरिकेने व्यापाराचा हवाला देऊन दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवल्याचा ट्रम्प यांनी केलेला दावाही एस. जयशंकर यांनी फेटाळून लावला.

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाची घोषणा केली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं. त्यावेळी पीएमओमध्ये काय वातावरण होतं. असं विचारलं असता, जयशंकर म्हणाले की, त्यावेळी काय घडलं याच्या नोंदी खूप स्पष्ट आहेत. हा युद्धविराम दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी निश्चित केला होता. त्यामुळे मी हा मुद्दा इथेच संपवतो. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये भारत आणि अमेरिका हेच मध्यवर्ती आहेत. आमचा देश एक मोठा देश आहे. जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आमचा समावेश होतो. आमची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आमचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारतानाही आपल्यामध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे, असे जयशंकर यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामावर १८ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणावेळीही जोरदार चर्चा झाली होती, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पS. Jaishankarएस. जयशंकर