शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:04 IST

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शनिवारी रात्री ११ वाजल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात शांतता परतली आणि रविवारी कोणत्याही नवीन गोळीबाराचे किंवा ड्रोन घुसखोरी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, येथे युद्धाच्या भीतीचे वातावरण कायम आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

उरीमधील कमलकोट येथील रहिवासी मुनीर हुसेन म्हणाले की, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री नियंत्रण रेषेला लागून असलेल्या या गावात आणि त्यांच्या आसपासच्या भागात शांतता होती. पण, त्यांना अजूनही बंकरमधून बाहेर पडण्याचे धाडस करता आलेले नाही.निवृत्त लष्करी कर्मचारी हुसेन म्हणाले की, शेवटचे काही दिवस मोठ्या संकटासारखे होते.

१९९९ च्या (भारत-पाकिस्तान) युद्धादरम्यानही इतका गोळीबार पाहिला नव्हता. मला आशा आहे की शांतता नांदू लागेल. मात्र, युद्धबंदी लागू असली तरी, जम्मूमध्ये तणाव कायम आहे. संशयित दहशतवाद्यांनी नगरोटा परिसरातील लष्कराच्या १६ व्या कॉर्प्स मुख्यालयावर गोळीबार केला असून, यात एक सैनिक जखमी झाला आहे.

पाकच्या गोळीबारात २२ नागरिकांचा मृत्यू

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांना गोळीबाराचा सर्वाधिक फटका बसला. यात किमान २२ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.

काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार? : काश्मीरमध्ये आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या अफवांना उधाण आले. युद्धबंदीचा फायदा घेत सीमा ओलांडण्यात अनेक दहतशवादी यशस्वी झाल्याचेही समोर येत आहे.

नागरिक म्हणतात…

जम्मू शहरातील नागरिकांना रात्रभर नीट झोप लागली नाही. आता क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले होणार नाहीत हे लहान मुलांना समजावून सांगताना पालकांना नाकीनऊ आले. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांना तोंड देणाऱ्या जम्मूच्या लोकांनी कधीही बंकर उभारले नाहीत.  पुंछ येथील रहिवासी मुर्तजा अली यांनी सांगितले की, आता पूर्ण शांतता आहे. पण, पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच मला रात्रभर झोप लागली नाही.

रात्रभर संभ्रम; सकाळी जनजीवन सुरळीत

जयपूर : युद्धबंदी जाहीर झाल्यांनतर राजस्थानच्या सीमा भागात संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, रविवारी सकाळपासून सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले. उत्तर-पश्चिम रेल्वेने सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रविवारी रद्द झालेल्या १६ गाड्या पुन्हा सुरू केल्या. 

अनेक भागांत क्षेपणास्त्रासारखे अवशेष

राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत रविवारी पडलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या आकाराचे अवशेष सापडले. मात्र, युद्धबंदी जाहीर झालेली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण नव्हते. नंतर रविवारी दिवसभर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले.

पंजाबमध्येही शांतता

शनिवारी रात्रीपासून पाकिस्तानलगत असलेल्या पंजाबच्या सीमेवरही शांतता आहे. संवेदनशील अमृतसर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्व व्यवहार नियमितपणे चालू ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकJammu Kashmirजम्मू-काश्मीर