शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:04 IST

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शनिवारी रात्री ११ वाजल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात शांतता परतली आणि रविवारी कोणत्याही नवीन गोळीबाराचे किंवा ड्रोन घुसखोरी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, येथे युद्धाच्या भीतीचे वातावरण कायम आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

उरीमधील कमलकोट येथील रहिवासी मुनीर हुसेन म्हणाले की, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री नियंत्रण रेषेला लागून असलेल्या या गावात आणि त्यांच्या आसपासच्या भागात शांतता होती. पण, त्यांना अजूनही बंकरमधून बाहेर पडण्याचे धाडस करता आलेले नाही.निवृत्त लष्करी कर्मचारी हुसेन म्हणाले की, शेवटचे काही दिवस मोठ्या संकटासारखे होते.

१९९९ च्या (भारत-पाकिस्तान) युद्धादरम्यानही इतका गोळीबार पाहिला नव्हता. मला आशा आहे की शांतता नांदू लागेल. मात्र, युद्धबंदी लागू असली तरी, जम्मूमध्ये तणाव कायम आहे. संशयित दहशतवाद्यांनी नगरोटा परिसरातील लष्कराच्या १६ व्या कॉर्प्स मुख्यालयावर गोळीबार केला असून, यात एक सैनिक जखमी झाला आहे.

पाकच्या गोळीबारात २२ नागरिकांचा मृत्यू

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांना गोळीबाराचा सर्वाधिक फटका बसला. यात किमान २२ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.

काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार? : काश्मीरमध्ये आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या अफवांना उधाण आले. युद्धबंदीचा फायदा घेत सीमा ओलांडण्यात अनेक दहतशवादी यशस्वी झाल्याचेही समोर येत आहे.

नागरिक म्हणतात…

जम्मू शहरातील नागरिकांना रात्रभर नीट झोप लागली नाही. आता क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले होणार नाहीत हे लहान मुलांना समजावून सांगताना पालकांना नाकीनऊ आले. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांना तोंड देणाऱ्या जम्मूच्या लोकांनी कधीही बंकर उभारले नाहीत.  पुंछ येथील रहिवासी मुर्तजा अली यांनी सांगितले की, आता पूर्ण शांतता आहे. पण, पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच मला रात्रभर झोप लागली नाही.

रात्रभर संभ्रम; सकाळी जनजीवन सुरळीत

जयपूर : युद्धबंदी जाहीर झाल्यांनतर राजस्थानच्या सीमा भागात संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, रविवारी सकाळपासून सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले. उत्तर-पश्चिम रेल्वेने सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रविवारी रद्द झालेल्या १६ गाड्या पुन्हा सुरू केल्या. 

अनेक भागांत क्षेपणास्त्रासारखे अवशेष

राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत रविवारी पडलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या आकाराचे अवशेष सापडले. मात्र, युद्धबंदी जाहीर झालेली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण नव्हते. नंतर रविवारी दिवसभर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले.

पंजाबमध्येही शांतता

शनिवारी रात्रीपासून पाकिस्तानलगत असलेल्या पंजाबच्या सीमेवरही शांतता आहे. संवेदनशील अमृतसर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्व व्यवहार नियमितपणे चालू ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकJammu Kashmirजम्मू-काश्मीर