शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:22 IST

PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले.  

PM Modi Operataion Sindoor Latest News: "हे युग युद्धाचे नाहीये, पण हे युग दहशतवादाचेही नाहीये. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ही चांगलं विश्वाची ग्यॅरंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानचे सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. हाच दहशतवाद एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेन", असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशवाद्यांना अशाच पद्धतीने उत्तर भविष्यातही दिले जाईल. दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तान सरकारला एकाच नजरेनं बघितलं जाईल, स्पष्ट मेसेज पंतप्रधान मोदींनी दिला. 

पाकिस्तानला वाचायचं असेल, तर...

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाहीये."

वाचा >>"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

"भारताचे मत एकदम स्पष्ट आहे की, दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगालाही सांगू इच्छितो की, आमचे धोरण राहिले आहे की, पाकिस्तानसोबत जर चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल", अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडली. 

आता पाकव्याप्त काश्मीरच चर्चा होईल

"पाकिस्तानसोबत चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्ग सुद्धा शक्तीने होतो. भारताचं शक्तिशाली होणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यावर त्या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. मागील काही दिवसांत भारताने तेच केले आहे", असे मोदी देशवासीयांशी बोलताना म्हणाले.

कुंकू पुसरण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला

मोदी म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभे राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळलं आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो."

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTerrorismदहशतवादIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक