शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:22 IST

PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले.  

PM Modi Operataion Sindoor Latest News: "हे युग युद्धाचे नाहीये, पण हे युग दहशतवादाचेही नाहीये. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ही चांगलं विश्वाची ग्यॅरंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानचे सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. हाच दहशतवाद एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेन", असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशवाद्यांना अशाच पद्धतीने उत्तर भविष्यातही दिले जाईल. दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तान सरकारला एकाच नजरेनं बघितलं जाईल, स्पष्ट मेसेज पंतप्रधान मोदींनी दिला. 

पाकिस्तानला वाचायचं असेल, तर...

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाहीये."

वाचा >>"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

"भारताचे मत एकदम स्पष्ट आहे की, दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगालाही सांगू इच्छितो की, आमचे धोरण राहिले आहे की, पाकिस्तानसोबत जर चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल", अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडली. 

आता पाकव्याप्त काश्मीरच चर्चा होईल

"पाकिस्तानसोबत चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्ग सुद्धा शक्तीने होतो. भारताचं शक्तिशाली होणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यावर त्या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. मागील काही दिवसांत भारताने तेच केले आहे", असे मोदी देशवासीयांशी बोलताना म्हणाले.

कुंकू पुसरण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला

मोदी म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभे राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळलं आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो."

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTerrorismदहशतवादIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक