शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:22 IST

PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले.  

PM Modi Operataion Sindoor Latest News: "हे युग युद्धाचे नाहीये, पण हे युग दहशतवादाचेही नाहीये. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ही चांगलं विश्वाची ग्यॅरंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानचे सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. हाच दहशतवाद एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेन", असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशवाद्यांना अशाच पद्धतीने उत्तर भविष्यातही दिले जाईल. दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तान सरकारला एकाच नजरेनं बघितलं जाईल, स्पष्ट मेसेज पंतप्रधान मोदींनी दिला. 

पाकिस्तानला वाचायचं असेल, तर...

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाहीये."

वाचा >>"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

"भारताचे मत एकदम स्पष्ट आहे की, दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगालाही सांगू इच्छितो की, आमचे धोरण राहिले आहे की, पाकिस्तानसोबत जर चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल", अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडली. 

आता पाकव्याप्त काश्मीरच चर्चा होईल

"पाकिस्तानसोबत चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्ग सुद्धा शक्तीने होतो. भारताचं शक्तिशाली होणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यावर त्या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. मागील काही दिवसांत भारताने तेच केले आहे", असे मोदी देशवासीयांशी बोलताना म्हणाले.

कुंकू पुसरण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला

मोदी म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभे राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळलं आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो."

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTerrorismदहशतवादIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक