शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:01 IST

Indian Airspace Alert: सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो. 

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जामनगर एअरपोर्टचा समावेश आहे. भारताच्या प्रमुख एअरलाइन्सने त्यांच्या उड्डाणांबाबत सोशल मिडिया प्लॅटफोर्म एक्सवर माहिती शेअर केली आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकवर स्ट्राईक केला. त्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली.

 

Indigo Airlines ने १६० डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द केल्यात. दिल्ली एअरपोर्टवरून विविध विमान वाहतूक कंपन्यांनी २० फ्लाईट्स रद्द केल्यात. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले आहे. या स्ट्राईकनंतर भारतीय विमान वाहतूक सेवेवर खबरदारी म्हणून काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

एअर इंडियाने जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथल्या सर्व फ्लाईट्स १० मे सकाळी ५.२९ मिनिटांपर्यंत रद्द केल्या आहेत. त्याशिवाय सीमा भागातील शहरांमध्ये आणि संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट करत त्यावर मिसाईल हल्ला केला. सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो.

 

पाकिस्तानी एअरस्पेस रिकामा

भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानी एअरस्पेस ओस पडला आहे. पाकिस्तानने देशातील विमान सेवा खंडीत केली आहे. इस्लामाबाद विमानतळापासून देशातील अनेक विमान उड्डाणे रद्द केलीत. अनेक प्रमुख देशांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमान प्रवास करणे टाळले आहे. पुढील सूचना येईपर्यंत दक्षिण आशियातील भारत-पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील विमान सेवा फ्रान्सने निलंबित केली आहे. ब्रिटीश एअरवेज, स्वीस इंटरनॅशनल, अमीरातसह अनेक उड्डाणे अरबी समुद्रातून प्रवास करत दिल्लीला पोहचत आहेत. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAir Indiaएअर इंडियाIndigoइंडिगोsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक