शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन बजेट

By admin | Updated: July 3, 2014 18:14 IST

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर दोन प्रश्न टांगत्या तलवारीसारखे आहेत.

- परनजॉय  गुहा ठाकुरथा
 
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर दोन प्रश्न टांगत्या तलवारीसारखे   आहेत. या दोन प्रश्नांची उत्तरं ना जेटली यांच्याकडे आहेत ना तुम्हा-आम्हाकडे आहेत. या प्रश्नांच्या उत्तरावरच अर्थसंकल्पाचे स्वरूप  अवलंबून असेल. उत्तरं पाहून हा अर्थसंकल्प कठोर, नरम, भविष्यवादी   की परंपरावादी की येते आठ महिने कसेबसे ढकलण्यापुरता राहील, ते सांगता येईल. यंदाचा पाऊस किती कमी असेल? हा पहिला प्रश्न आहे.  इराकमधील अराजकाची परिस्थिती पाहता कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात वाढतील का आणि वाढतील तर किती वाढतील? हा दुसरा प्रश्न झाला. 
नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात विशेष असे  काही नसते असा अनुभव आहे. आल्या आल्या मोठे निर्णय घ्यायचे नसतात. परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो. जेटलींच्या अर्थसंकल्पातही फार तोडफोड नसेल. उरलेले आठ महिने काढण्यापुरता कामचलाऊ अर्थसंकल्प दिला जाईल, अशी शक्यता आहे. मोठे निर्णय थांबवून ठेवले जातील.  1996, 2004 आणि 2009 साली नवे सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पहिल्या वर्षी सादर केलेला अर्थसंकल्प अशाच स्वरूपाचा होता. फार मोठे दिशादर्शक निर्णय नव्हते.  याला अपवाद जुलै 1991 मध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा. नरसिंहराव सरकारच्या या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला जगाचे दरवाजे उघडे करून दिले. 
1991 चा अर्थसंकल्प येण्याआधी देशात प्रचंड राजकीय अस्थैर्य होते. व्ही. पी. सिंग यांचे सरकार पडले होते, चंद्रशेखर यांचे सरकार अल्पजीवी ठरले होते आणि त्या वर्षी जूनमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली होती. अस्थिरतेच्या या हवेने घाबरून अनिवासी भारतीयांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या होत्या. आयातीची 15 दिवसांची गरज भागेल एवढीच परकीय चलनाची गंगाजळी आपल्याकडे उरली होती. परकीय कर्जाचा हप्ता भरता येणार नाही की काय अशी शंका होती. या सा:या पाश्र्वभूमीवर आपण आपल्या रुपयाचे मोठे अवमूल्यन केले. नंतर लगेच अर्थसंकल्प आला. या गोष्टीला 23 वर्षे झाली. सा:या संकटातून निसटून भारतीय अर्थव्यवस्था आज दिसते त्या अवस्थेत उभी आहे. पण म्हणून सध्याच्या आर्थिक संकटांना कमी लेखता येणार नाही. पाऊस कमी पडला तर काय होईल याचा विचार करा. आपल्याकडे 6क् टक्के शेती कोरडवाहू आहे. म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.  पाऊस कमी पडला तर दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. तसे झाले तर अन्नधान्याच्या किमती महागतील. सामान्य शेतक:यांपासून अर्थमंत्र्यार्पयत सारेजण इंद्रदेवाची प्रार्थना करीत आहेत. पावसाच्या कमतरतेमुळे अन्नधान्याचा तुटवडा पडेल अशी स्थिती नाही. आपल्याकडे गहू आणि तांदळाचा भरपूर साठा आहे. पण धान्य उत्पादन कमी झाले तर महागाई वाढण्याची भीती आहे. ते सुरूही झाले आहे. कांद्याचे भाव अचानक वधारले आहेत.  
भारताच्या सकल देशी उत्पन्नात म्हणजे जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 15 टक्केपेक्षा कमी आहे. पण निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या निर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. कृषी उत्पादन घटले तर जीडीपी वाढीवर त्याचा परिणाम होईल. कृषी उत्पन्न घसरेल. ग्रामीण क्षेत्रंतून   उपभोग्य वस्तूंची मागणी कमी होईल. जीडीपी वाढवण्याच्या प्रय}ांना खीळ बसेल.  
   जागतिक तेलाच्या किमती ही आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्ट आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती काय असतील हे आपण ठरवू शकत नाही. कच्च्या तेलाच्या आपल्या गरजेच्या 7क् टक्के तेल आपण आयात करतो. मोठय़ा प्रमाणात तेल उत्पादन करणा:या इराकमधल्या यादवीने तेल संकट चिघळले आहे. तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि त्या आणखी वाढणार आहेत. इराकमधील संघर्ष इतक्या लवकर संपणार नाही.  जागतिक बाजारात आजच तेलाच्या किमती एका बॅरलला 115 डॉलर्सवर गेल्या आहेत. इराकचे संकट संपले नाही तर  तेलाच्या किमती किती वर जातील याची कल्पनाच करवत नाही.  मागील काही वर्षे तेलाच्या किमती फार अस्थिर नव्हत्या. त्या दृष्टीने भारत सुदैवी राहिला. सरकारने पेट्रोलच्या किमतीचे विनियंत्रण केले आणि हाय स्पीड डिङोलच्या किमती हळूहळू वाढू दिल्या. पेट्रोलियम उत्पादनात डिङोलचा खप सर्वाधिक आहे. डिङोलच्या किमती  एक-दोन रुपये वाढल्या तरी त्या जागतिक किमतीच्या बरोबरीत येतील असे वाटत होते. पण आता कठीण दिसते. कच्चे तेल आधीच कडाडले आहे. डिङोलवरील सबसिडी कमी करण्याचा या वेळी सरकारचा इरादा होता. पण नव्या जागतिक संकटाने आता ते शक्य होणार नाही. नैसर्गिक वायूची दरवाढ तूर्त तीन महिने सरकारने पुढे ढकलली आहे. स्वयंपाकाचा गॅस किमान तीन महिने महागणार नाही. त्यामुळे खत उत्पादनावर केंद्र सरकार मोठय़ा प्रमाणावर सबसिडी देते. गॅस दरवाढ लांबवली याचा अर्थ खत उत्पादनावरील सबसिडी भरमसाठ वाढवावी लागणार आहे. सरकारवरचे आर्थिक ओङो यामुळे वाढणार आहे.  अर्थसंकल्पाची आकडेमोड करताना अर्थमंत्री जेटली यांना ही सारी गणिते हिशोबात घ्यावी लागणार आहेत. केंद्र सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च अधिक आहे. या सर्व हवेत आर्थिक तूट नियंत्रणात ठेवणो जेटलींना अवघड जाणार आहे. जेटलींपुढे पर्याय कमी आहेत आणि निवडीला फार वाव नाही. 
 (लेखक हे विख्यात अर्थतज्ज्ञ आहेत. )