शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

केवळ शिवलिंगासमोर बाळगावी लागणार शांतता! अमरनाथ मंदिरातील मंत्रजागर, बंदी प्रकरणी एनजीटीचे स्पष्टीकरण  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 2:54 PM

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता...

जम्मू - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता या प्रकरणात एनजीटीने स्पष्टीकरण दिले असून, अमरनाथमध्ये कोणत्याही प्रकारचे शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले नसून केवळ शिवलिंगासमोर शांतता बाळगण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जाहीर केल्यानंतर भारतीय पक्षाने या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर याबाबत खुलासा करताना राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे की, "अमरनाथमध्ये कुठलेही शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलेले नाही.  भक्तगणांना केवळ शिवलिंगासमोर शांतता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. हे बंधन गुहेतील अन्य कुठल्याही भागात लागू नसेल. त्याचबरोबर एक मार्गी रांग कायम ठेवली जाईल." काश्मीरमधील भगवान शंकराच्या अमरनाथ या पवित्र मंदिरात घंटानाद करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी घातल्याचे वृत्त काल आले होते. तो परिसर शांतता क्षेत्र असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हा आदेश दिल्याचे या वृत्तात म्हटले होते हिमालयात ३,८८ मीटर उंचीवर असलेल्या या गुंफेमध्ये येणा-या भाविकांना मंत्रघोष व जयजयकारही करू दिला जाऊ नये, असाही आदेश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने अमरनाथ मंदिर प्रशासनास दिला, असल्याचे वृत्त होते.अमरनाथपर्यंत जाण्याचा डोंगर पायवाटेचा मार्ग खडतर असल्याने गर्दी आणि रेटारेटी यामुळे तेथे नेहमीच दुर्घटना होण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी अधिक सुरक्षाउपाय व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, असे न्यायाधिकरणाने याआधी सांगितले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता हे नवे आदेश देण्यात आले होते.काश्मीरमधील वैष्णोदेवी या पवित्र तीर्थस्थानी होणा-या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी न्यायाधिकरणाने गेल्या महिन्यात जाणा-या भाविकांच्या संख्येवर प्रतिदिन ५० हजाराची कमाल मर्यादा घातली होती.

भाविकांच्या सामानावरही निर्बंधभाविकांनी मंदिरात जाण्यापूर्वी मोबाइल फोनसह आपले सामान शेवटच्या चेक पोस्टवर ठेवावे आणि तेथून पुढे एकेरी रांग लावून मंदिरापर्यंत जावे. शेवटच्या चेक पोस्टपाशी भाविकांचे सामान ठेवून घेण्यासाठी प्रशासनाने एखादी खोली बांधावी, असेही न्यायाधिकरणाने सांगितले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHinduismहिंदुइझमIndiaभारत