शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 19:31 IST

Onion Rate Hike: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. असे असले तरी हा निर्णय कांद्याचा दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंद घातली होती. यामुळे नाशिक पट्ट्यातील शेतकरी भाजपवर प्रचंड नाराज झाले होते. याचा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा रोष विधानसभेलाही अंगावर येऊ नये म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका देशभरातील नागरिकांना बसणार आहे. 

कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते. यामुळे संतापलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील भाजी मंडई, व्यापार बंद ठेवला होता. यानंतर केंद्राने मे २०२४ मध्ये पुन्हा किमान निर्यात मूल्याची अट 50 डॉलर प्रति टन एवढी घातली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाल्याने अनेक राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आजही केंद्र सरकारवर नाराज आहेत. 

देशात कांद्याचे दर ६० ते ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आदेश जारी करत एनसीसीएफ आणि नाफेडला विविध शहरांमध्ये 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याचे आदेश दिले आहेत. बाजारात कांद्याचे भाव पडले की सरकार गायब होते आणि वाढले की ते दर कोसळविण्यासाठी कमी दराने कांदा बाजारात आणते, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जात नाही, असा आरोप या संघटनांनी केला आहे. 

यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा महायुतीला धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा हा राग शांत करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मुल्य रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असला तरी शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा परदेशात विकतील आणि देशातील बाजारात कमी प्रतीचा, कमी प्रमाणावर कांदा उपलब्ध होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 

नवीन कांद्याचे पीक येण्यास अद्याप दोन-तीन महिने लागणार आहेत. साठविलेला कांदा परदेशात विकला जाणार असल्याने देशातील कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, यामुळे मागणी वाढल्याने गेल्या १५-२० दिवसांत कांद्याचे दर वाढू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :onionकांदाvidhan sabhaविधानसभा