शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 19:31 IST

Onion Rate Hike: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. असे असले तरी हा निर्णय कांद्याचा दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंद घातली होती. यामुळे नाशिक पट्ट्यातील शेतकरी भाजपवर प्रचंड नाराज झाले होते. याचा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा रोष विधानसभेलाही अंगावर येऊ नये म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका देशभरातील नागरिकांना बसणार आहे. 

कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते. यामुळे संतापलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील भाजी मंडई, व्यापार बंद ठेवला होता. यानंतर केंद्राने मे २०२४ मध्ये पुन्हा किमान निर्यात मूल्याची अट 50 डॉलर प्रति टन एवढी घातली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाल्याने अनेक राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आजही केंद्र सरकारवर नाराज आहेत. 

देशात कांद्याचे दर ६० ते ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आदेश जारी करत एनसीसीएफ आणि नाफेडला विविध शहरांमध्ये 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याचे आदेश दिले आहेत. बाजारात कांद्याचे भाव पडले की सरकार गायब होते आणि वाढले की ते दर कोसळविण्यासाठी कमी दराने कांदा बाजारात आणते, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जात नाही, असा आरोप या संघटनांनी केला आहे. 

यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा महायुतीला धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा हा राग शांत करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मुल्य रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असला तरी शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा परदेशात विकतील आणि देशातील बाजारात कमी प्रतीचा, कमी प्रमाणावर कांदा उपलब्ध होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 

नवीन कांद्याचे पीक येण्यास अद्याप दोन-तीन महिने लागणार आहेत. साठविलेला कांदा परदेशात विकला जाणार असल्याने देशातील कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, यामुळे मागणी वाढल्याने गेल्या १५-२० दिवसांत कांद्याचे दर वाढू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :onionकांदाvidhan sabhaविधानसभा