शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 19:31 IST

Onion Rate Hike: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. असे असले तरी हा निर्णय कांद्याचा दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंद घातली होती. यामुळे नाशिक पट्ट्यातील शेतकरी भाजपवर प्रचंड नाराज झाले होते. याचा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा रोष विधानसभेलाही अंगावर येऊ नये म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका देशभरातील नागरिकांना बसणार आहे. 

कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते. यामुळे संतापलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील भाजी मंडई, व्यापार बंद ठेवला होता. यानंतर केंद्राने मे २०२४ मध्ये पुन्हा किमान निर्यात मूल्याची अट 50 डॉलर प्रति टन एवढी घातली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाल्याने अनेक राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आजही केंद्र सरकारवर नाराज आहेत. 

देशात कांद्याचे दर ६० ते ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आदेश जारी करत एनसीसीएफ आणि नाफेडला विविध शहरांमध्ये 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याचे आदेश दिले आहेत. बाजारात कांद्याचे भाव पडले की सरकार गायब होते आणि वाढले की ते दर कोसळविण्यासाठी कमी दराने कांदा बाजारात आणते, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जात नाही, असा आरोप या संघटनांनी केला आहे. 

यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा महायुतीला धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा हा राग शांत करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मुल्य रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असला तरी शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा परदेशात विकतील आणि देशातील बाजारात कमी प्रतीचा, कमी प्रमाणावर कांदा उपलब्ध होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 

नवीन कांद्याचे पीक येण्यास अद्याप दोन-तीन महिने लागणार आहेत. साठविलेला कांदा परदेशात विकला जाणार असल्याने देशातील कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, यामुळे मागणी वाढल्याने गेल्या १५-२० दिवसांत कांद्याचे दर वाढू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :onionकांदाvidhan sabhaविधानसभा