शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
2
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
3
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
4
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
5
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
6
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
7
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
8
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
9
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
10
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
11
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
12
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
13
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
14
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
15
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
16
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
18
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
19
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
20
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:41 IST

जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली

पटणा - देशात एकीकडे व्होटभक्तीचं राजकारण होत आहे तर दुसरीकडे देशभक्ती सुरु आहे. 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण करा, त्यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केलं होतं? जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.  बिहारच्या अररियामध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी लोकांना संबोधित केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीय जवानांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली. मात्र भारतीय जवानांना परवानगी नाकारण्यात आली. कारण काँग्रेसला मतांचे राजकारण करायचं होतं. सर्वांना माहित होतं की, ते दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. मात्र काँग्रेसने पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी हिंदू लोकांना हिंदू दहशतवादी शब्द लावण्याचं षडयंत्र केलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. 

आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, दहशतवाद्यांना मारलं म्हणून काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेतही नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सांगितले की जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर पहिलं चीटफंड घोटाळा आणि घुसखोरी करणाऱ्यांचे पुरावे शोधा. सैनिकांच्या धाडसाचे पुरावे मागणं बंद करा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. 

एवढ्या उन्हातही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित झालात. तुमची तपस्या मी वाया जावू देणार नाही. त्याचा परतावा मी व्याजासह तुम्हाला परत देणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच ज्यांना भारत मातेची अडचण होते असे लोक भारत तेरे तुकडे होंगे नारे लावणाऱ्यांच्या मागे जातात. असे लोक देशाच्या सेवेसाठी कशाला पुढे येणार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत कन्हैयाकुमारवर टीका केली. 

देशभक्तीचं राजकारण काय असतं हे तुम्ही उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर काय होतं हे बघितलं. भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं आणि पाकिस्तानचं तोंड बंद केलं. मात्र दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेस नेते शोक व्यक्त करत आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाararia-pcअररियाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019