शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
2
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
3
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
4
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
5
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
6
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
7
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
8
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
9
"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
10
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
11
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
12
कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?
13
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
14
पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद, तज्ञांनी व्यक्त केली चिंता...
15
"एक-दोन नाही, हजारो कपल्सच्या रोमान्सचे व्हिडीओ रेकॉर्ड"; आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
17
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
18
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
19
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
20
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:41 IST

जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली

पटणा - देशात एकीकडे व्होटभक्तीचं राजकारण होत आहे तर दुसरीकडे देशभक्ती सुरु आहे. 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण करा, त्यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केलं होतं? जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.  बिहारच्या अररियामध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी लोकांना संबोधित केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीय जवानांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली. मात्र भारतीय जवानांना परवानगी नाकारण्यात आली. कारण काँग्रेसला मतांचे राजकारण करायचं होतं. सर्वांना माहित होतं की, ते दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. मात्र काँग्रेसने पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी हिंदू लोकांना हिंदू दहशतवादी शब्द लावण्याचं षडयंत्र केलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. 

आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, दहशतवाद्यांना मारलं म्हणून काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेतही नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सांगितले की जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर पहिलं चीटफंड घोटाळा आणि घुसखोरी करणाऱ्यांचे पुरावे शोधा. सैनिकांच्या धाडसाचे पुरावे मागणं बंद करा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. 

एवढ्या उन्हातही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित झालात. तुमची तपस्या मी वाया जावू देणार नाही. त्याचा परतावा मी व्याजासह तुम्हाला परत देणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच ज्यांना भारत मातेची अडचण होते असे लोक भारत तेरे तुकडे होंगे नारे लावणाऱ्यांच्या मागे जातात. असे लोक देशाच्या सेवेसाठी कशाला पुढे येणार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत कन्हैयाकुमारवर टीका केली. 

देशभक्तीचं राजकारण काय असतं हे तुम्ही उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर काय होतं हे बघितलं. भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं आणि पाकिस्तानचं तोंड बंद केलं. मात्र दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेस नेते शोक व्यक्त करत आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाararia-pcअररियाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019