शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शाहीन बागेचा रस्ता अ‍ॅम्बुलन्ससाठी खुला केला; आंदोलनामुळे दोन महिन्यांपासून होता बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 12:18 PM

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळील बॅरीकेड्स हटविले.

ठळक मुद्देबदरपूरला जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 20 मिनिटांच्या मार्गासाठी अडीज तास लागत होते. एक रस्ता खुला करण्यात आल्याने दोन महिन्यांपासून त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलनामुळे तेथील रस्ते बंद झाले होते. आज अखेर एक रस्ता खुला करण्यात आल्याने दोन महिन्यांपासून त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. फरिदाबाद आणि जेतपूरकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांवरील बॅरिकेड्स पोलिसांनी हटविले आहेत. मात्र, आंदोलकांनी कालिंदीकुंजचा रस्ता अद्यापही बंद करून ठेवला आहे. दरम्यान पोलिसांनी अॅम्बुलन्ससाठी काही वेळ रस्ता खुला केल्याचा खुलासा केला.

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळील बॅरीकेड्स हटविले. यामुळे बदरपूरला जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लोकांना मदनपूर खादर मार्गावरून जावे लागत होते. त्यांचा मोठा वळसा आता वाचणार आहे. तर फरीदाबादला जाण्यासाठी लोकांना डीएनडीद्वारे आश्रमवरून कित्येक किमी फिरून जावे लागत होते. 

मदनपूर खादर रस्त्यावरून जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. मात्र, रस्ता बंद असल्याने त्यांना जाण्यासाठी अडीज तास लागत होते. आता रस्ता खुला केल्याने बदरपूर, जैतपूरला राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोएडा पोलिसांना हा रस्ता बंद करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आंदोलक या रस्त्यापासून खूप दूर अंतरावर बसलेले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

मात्र, आंदोलकांमुळे शाहीन बागेहून कालिंदीकुंजला जाणारा रस्ता क्रमांक 13A बंदच आहे. यामुळे नोएडाच्या बाजुने 500 मीटर अंतरावर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी 13 डिसेंबरपासून आंदोलन सुरु आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनdelhiदिल्ली