शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

एक साधू चढला मोबाइल टॉवरवर, दुसऱ्याने पेटवून घेतले; नेमकं काय आहे प्रकरण..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:50 IST

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे.

भरतपूर:राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भगवान कृष्णाचे क्रीडांगण असलेल्या आदिबाद्री परिसरात अवैध खाणकाम थांबवण्याची मागणी करत बाबा हरिबोल दास मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. 24 तास उलटूनही बाबा हरिबोल दास टॉवरवरुन उतरले नाहीत. सरकारने या भागातील खाणकाम बंद करून ते वनक्षेत्र घोषित करावे, अशी त्यांची अट आहे. या मागणीबाबत बाबा हरिबोल दास यांनी दोन दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. 

550 दिवसांपासून आंदोलन त्यांच्या इशाऱ्यानंत राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह त्यांचे मन वळवण्यासाठी आले होते. साधू आणि मंत्री यांच्यात संवाद झाला, मात्र त्यावर बाबा हरिबोल दास यांचे समाधान झाले नाही आणि ते मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. आदिबद्री भागातील खाणकाम बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे. मात्र आजपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही.

एका साधूने स्वतःला पेटवून घेतलेदरम्यान, याप्रकरणी ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका साधूने ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामुळे ते गंभीर भाजले. त्यांना गंभीर अवस्थेत प्रशासनाने डीईजी रुग्णालयात दाखल केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलीस प्रशासनात घबराट पसरली आहे. साधू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पळसोपा गावात साधू-संतांचे हे आंदोलन सुरू आहे.

या परिक्रमा मार्गात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे ज्या भागात अवैध उत्खनन होत आहे, तो परिसर गोवर्धन परिक्रमा मार्गाचा परिसर आहे. हा परिसर भगवान श्रीकृष्णाचे क्रीडांगण मानला जातो. हा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळ आहे. गोवर्धन पर्वताच्या या परिक्रमा मार्गात भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत कृष्णाच्या या भूमीला वाचवण्यासाठी साधू संत अनेक वर्षांपासून झटत आहेत, मात्र त्यांचे ऐकले जात नाही. आता हे प्रकरण बाबा हरिबोल दास टॉवरवर चढल्यामुळे सोशल मीडियातही चर्चेत आले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन