शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

महात्मा गांधींनी साधे राहणीमान स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण; हुतात्मा कनकलता यांना देशाचे अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 6:54 AM

दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले. 

 

नवी दिल्ली :भारतातील गरीब लोक जसा वेश परिधान करतात तसेच आपणही राहायचे असे ठरवून महात्मा गांधी यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी आपल्या गुजराती वेशभूषेचा त्याग केला व ते पंचा नेसू लागले. या ऐतिहासिक घटनेला बुधवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. आसाममधील स्वातंत्र्यसेनानी कनकलता बरूआ या एका पोलीस ठाण्यावर २० सप्टेंबर १९४२ रोजी ध्वज फडकविण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली. देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, या ऐतिहासिक घटनांचे देशभरात स्मरण केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी देशभर दौरा करून जनतेच्या स्थितीची पाहणी केली होती. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले. 

- देशातील गरीब जनता किती हालअपेष्टांमध्ये जगते आहे हे खूप जवळून पाहिल्यानंतर गांधीजींनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले. त्यांनी गुजराती पोशाखाचाही त्याग केला. निव्वळ पंचा नेसून यापुढे राहायचे असा निर्धार त्यांनी केला. - या अतिशय साध्या वेशात ते पहिल्यांदा मदुराई येथे   २२ सप्टेंबर १९२१     रोजी वावरले. तिथे त्यांनी भाषणही केले. - ती जागा गांधीजी पोट्टल म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली. 

महत्त्वाच्या घटनांना उजाळास्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आसाममध्ये एका पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याच्या प्रयत्नात असताना कनकलता बरुआ या अवघ्या १७ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसेनानी २० सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला जात आहे. त्यानुसार महात्मा गांधी व कनकलता बरुआ यांच्याशी संबंधित घटनांचे स्मरण करून त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आले.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत