शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:52 IST

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

जम्मू:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असून, इराणच्या धर्तीवर सरकार बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. तालिबानच्या या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारत सरकार तालिबानशी आमने-सामने चर्चा करणार असल्याचे बोलले जात असून, एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. (omar abdullah said modi govt should clear about whether taliban is terrorist group or not)

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा भारतावर काय परिणाम होईल, असा प्रश्न सामान्यांना पडला असताना, यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानचा जम्मू-काश्मीरवर काय परिणाम होईल, याबाबत केंद्रातील मोदी सरकारला विचारायला हवे. तसेच तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हेही मोदी सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने

अनुच्छेद ३७०  पुन्हा लागू करण्यासाठी संघर्ष करणार

अलकायदाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देत ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होण्यापूर्वी राज्याचा दर्जा आणि अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याचा पुनरुच्चार करत, यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीर निवडणुकांमध्ये ५० जागा मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये भाजपने ४४ जागा जिंकू असे म्हटले होते. ते पूर्ण झाले नाही. भाजपने आधी ४० जागा जिंकून दाखवाव्यात, असा टोला ओमर अब्दुल्ला यांनी लगावला आहे. 

घे भरारी! देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी कामगिरी; पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के नोंदवला GDP

बँक खाती उघडण्याची परवानगी द्यायला हवी

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे आधी स्पष्ट करायला हवे. तालिबान दहशतवादी संघटना असेल, तर आपण त्यांच्याशी चर्चा का करतोय आणि जर तालिबान दहशतवादी संघटना नाही, तर त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद्यांच्या यादीतून बाहेर ठेवायला हवे. त्यांना बँक खाती उघडण्याची अनुमती द्यायला हवी. आताच्या घडीला भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे भारताने यावर ठोस भूमिका घ्यायला हवी, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी