शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
2
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
3
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
4
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
5
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
6
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
7
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
8
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
9
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
10
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
11
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
12
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
13
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
14
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
15
IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला
16
Parth Pawar Land Deal:२१ कोटींचे मुद्रांक शुल्क  आम्ही भरणारच नाही; पार्थ पवारांच्या कंपनीचा न्यायालयात नकार
17
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
18
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
19
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
20
ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर
Daily Top 2Weekly Top 5

“काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 09:02 IST

दहशतवादी विचारसरणी खोलवर रुजलेली असून, जम्मू काश्मिरचा विकास हे त्याचे उत्तर नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू: काश्मिर खोऱ्यात होत असलेल्या टार्गेट किलिंगनंतर तेथील काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandits) पुन्हा एकदा स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शेकडो काश्मिरी पंडित कुटुंबे काश्मीर खोऱ्यातून जम्मूसह अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. याप्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असताना, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी यावर भाष्य केले आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरण हे पंतप्रधानांच्या रोजगार पॅकेजचे अपयश असून, मीही जबाबदार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक गोष्टीचे राजकीय फायदे आणि खर्चाच्या दृष्टीने तुलना केली जाऊ नये. यापेक्षा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ही त्यापैकी एक आहे. एखादा नोकरदार काश्मिरी पंडित स्थलांतर करतो, ते माझेही तितकेच अपयश आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच सध्याची परिस्थिती भाजपला पराभूत करण्याची चांगली संधी देऊ शकते. परंतु जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक गोष्टीकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिने पाहता कामा नये, असेही अब्दुल्ला यांनी नमूद केले आहे. 

रोजगार देण्यात कमी पडलो, हे माझेही अपयश

काश्मीरमधील हत्यांविरोधात निदर्शने आणि हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानंतर अनेक काश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांनीही खोऱ्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधान रोजगार पॅकेज आणणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारचा मी एक भाग होतो. त्याचे अपयश मी माझे अपयश मानेन. काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी आम्ही आमची नोकरी सोडून निघून जाऊ, असे सांगत असताना प्रशासनाचे म्हणणे आहे की, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, आम्ही आणखी एका स्थलांतराची परवानगी देऊ शकत नाही. 

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर परिस्थिती जैसे थे

५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० हटवण्यात आले. अनुच्छेद ३७० हे दहशतवाद, हिंसाचार, फुटीरतावादाचे मूळ कारण असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी घटनेतील हा भाग काढून टाकणे आवश्यक होते. हा युक्तिवाद बर्‍याच लोकांनी मान्य केला पण आता तो काढून टाकून जवळपास तीन वर्षे झाली आहेत, पण अद्यापही जम्मू-काश्मीरच्या परिस्थिती बदल झालेला दिसत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

जम्मू काश्मीरचा विकास हे दहशतवादाला उत्तर नाही

प्रत्येक सरकारचे दोष असतात पण असे एकही सरकार असे नाही की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणू शकाल की त्यांनी विकासाच्या नावाखाली काहीही केले नाही. मला वाटत नाही की बंदुक असलेला एकही अतिरेकी पकडल्यावर असे म्हणेल की मला माझ्या गावाला रस्ता न मिळाल्याने मी दुःखी आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे ते त्यापेक्षा खूप खोल आहे आणि आम्ही यावर चर्चा करण्यास तयार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्ला