शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

“काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 09:02 IST

दहशतवादी विचारसरणी खोलवर रुजलेली असून, जम्मू काश्मिरचा विकास हे त्याचे उत्तर नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू: काश्मिर खोऱ्यात होत असलेल्या टार्गेट किलिंगनंतर तेथील काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandits) पुन्हा एकदा स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शेकडो काश्मिरी पंडित कुटुंबे काश्मीर खोऱ्यातून जम्मूसह अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. याप्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असताना, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी यावर भाष्य केले आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरण हे पंतप्रधानांच्या रोजगार पॅकेजचे अपयश असून, मीही जबाबदार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक गोष्टीचे राजकीय फायदे आणि खर्चाच्या दृष्टीने तुलना केली जाऊ नये. यापेक्षा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ही त्यापैकी एक आहे. एखादा नोकरदार काश्मिरी पंडित स्थलांतर करतो, ते माझेही तितकेच अपयश आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच सध्याची परिस्थिती भाजपला पराभूत करण्याची चांगली संधी देऊ शकते. परंतु जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक गोष्टीकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिने पाहता कामा नये, असेही अब्दुल्ला यांनी नमूद केले आहे. 

रोजगार देण्यात कमी पडलो, हे माझेही अपयश

काश्मीरमधील हत्यांविरोधात निदर्शने आणि हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानंतर अनेक काश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांनीही खोऱ्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधान रोजगार पॅकेज आणणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारचा मी एक भाग होतो. त्याचे अपयश मी माझे अपयश मानेन. काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी आम्ही आमची नोकरी सोडून निघून जाऊ, असे सांगत असताना प्रशासनाचे म्हणणे आहे की, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, आम्ही आणखी एका स्थलांतराची परवानगी देऊ शकत नाही. 

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर परिस्थिती जैसे थे

५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० हटवण्यात आले. अनुच्छेद ३७० हे दहशतवाद, हिंसाचार, फुटीरतावादाचे मूळ कारण असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी घटनेतील हा भाग काढून टाकणे आवश्यक होते. हा युक्तिवाद बर्‍याच लोकांनी मान्य केला पण आता तो काढून टाकून जवळपास तीन वर्षे झाली आहेत, पण अद्यापही जम्मू-काश्मीरच्या परिस्थिती बदल झालेला दिसत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

जम्मू काश्मीरचा विकास हे दहशतवादाला उत्तर नाही

प्रत्येक सरकारचे दोष असतात पण असे एकही सरकार असे नाही की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणू शकाल की त्यांनी विकासाच्या नावाखाली काहीही केले नाही. मला वाटत नाही की बंदुक असलेला एकही अतिरेकी पकडल्यावर असे म्हणेल की मला माझ्या गावाला रस्ता न मिळाल्याने मी दुःखी आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे ते त्यापेक्षा खूप खोल आहे आणि आम्ही यावर चर्चा करण्यास तयार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्ला