शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पोटनिवडणुकांत ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी; अनेक ठिकाणी मतदानाविनाच निघून गेले मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 5:37 AM

लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या १0 अशा १४ जागांसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले असले, तरी पालघर, गोंदिया-भंडारा व यूपीतील कैराना लोकसभा मतदार संघांत ईव्हीएम (मतदान यंत्रे) बंद

मुंबई/नवी दिल्ली : लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या १0 अशा १४ जागांसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले असले, तरी पालघर, गोंदिया-भंडारा व यूपीतील कैराना लोकसभा मतदार संघांत ईव्हीएम (मतदान यंत्रे) बंद पडण्याचे, त्यात गडबड केल्याचे व विरोधी उमेदवारासमोरील बटन दाबले जात नसल्याच्या इतक्या तक्रारी आल्या की, ही यंत्रे म्हणजे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, काही यंत्रांमध्ये कडक ऊन आणि धुळीमुळे बिघाड झाल्याचे पालघरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पालघरमध्ये तब्बल २७६ मतदानयंत्रे बंद पडली, तर भंडारा-गोंदियामध्ये ७५ बुथवरील मतदानयंत्रे काम करीत नसल्याच्या १४१ तक्रारी आल्या. यंत्रे बंद पडल्याने अनेक मतदारांना परत जावे लागले. जिथे ही यंत्रे बंद पडली, तिथे दुसरी बसविली, तिथे मतदानास अधिक वेळ देत आहोत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले, पण घरी निघून गेलेले लोक अनेक ठिकाणी पुन्हा मतदानाला आलेच नाहीत. गोंदिया-भंडारामधील गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाºया ३४ बुथमधील मतदान बंदच राहिले. तिथे अतिरिक्त मतदान यंत्रे नसल्याने हा प्रकार घडला. पालघरमध्ये ४६.५० टक्के आणि गोंदिया-भंडारामध्ये ४२ टक्के मतदान झाले.शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी पालघरमधील गोंधळ जाणूनबुजून असल्याचा आरोप केला. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आ. हितेंद्र ठाकूर म्हणाले की, आमची जिथे विशेष ताकद आहे, त्याच भागांतील मतदान यंत्रांमध्येच कसा बिघाड झाला, याची चौकशी व्हायला हवी.मतदान यंत्रांमुळे उडालेला गोंधळ व उन्हाचा तडाखा, यामुळे पोटनिवडणुकांत मतदान कमीच झाल्याचे दिसून आले. सर्व ठिकाणी मतमोजणी ३१ मे रोजी होईल.ईव्हीएमविषयी तक्रारी गोंदिया-भंडारा व पालघरपुरत्या नसून, उत्तर प्रदेशच्या कैरानामध्येही ३००च्या वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. भंडारा-गोंदियात सुरतहून मागविलेल्या यंत्रांवर आम्ही आधीच आक्षेप घेतला होता. तशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेतली नाही. आता काही ठिकाणचे फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करण्यात येऊ नये.- प्रफुल्ल पटेल,राष्टÑवादी काँग्रेसचे नेतेफेरमतदानाची आवश्यकतानाही : आयोगविरोधकांनी मतदान यंत्रांविषयी केलेल्या तक्रारी जरा अतीच आहेत, तितका गोंधळ झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. कुठेही आज मतदान रद्द केलेले नाही व फेरमतदानाची गरज नाही, अशी भूमिका आयोगाने घेतल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी दोन्ही मतदारसंघांत जिथे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तिथे फेरमतदान घ्यावे व मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट स्लीपचीही मोजणी करावी, अशी मागणी केली. निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली नाही. भाजपाचे कार्यकर्ते खुलेआम मतदारांना पैसे वाटत होते, काहींना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले, असे सांगून, ते म्हणाले की, २५ टक्के ईव्हीएम बंद पडणे हे संशयास्पद आहे. याची सखोल चौकशी आवश्यक आहे.पराभवाच्या भीतीमुळेच भाजपाने मतदान यंत्रांत बिघाड केला. गोंदिया-भंडारामध्ये ४00 हून अधिक मतदान यंत्रे नीट काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष भारिप-बहुजन महासंघया मतदारसंघात २७६ मतदान यंत्रे बंद पडली, परंतु पर्यायी यंत्रे तत्काळ पुरविल्याने मतदान फार काळ खोळंबले नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. राजकीय पक्षांनी मतदानाची वेळ वाढवून मागितली. परंतु उपस्थित सर्वांना मतदान करू दिले जाईल. वेळ वाढवून दिली जाणार नाही, असा पवित्रा निवडणूक यंत्रणेने घेतला.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सोमवारी ४६.५० टक्के मतदान झाले. सर्वच पक्षांना ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Loksabhaलोकसभा