शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लॉकडाऊन शिथिलतेनंतरही वाढतेय रुग्णांची संख्या, देशात ५२,९५२ कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 10:02 IST

केंद्र सरकारने लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशात आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढतच आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा हाहाकार भारतात सुरूच असून, बुधवारी रुग्णसंख्या ५२,९५२ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णांची संख्या ३५६१ ने वाढली असून ८९ मृत्युंची नोंद झाली आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतरही देशातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. गेल्या तीन दिवसांत ४० हजारांमध्ये तब्बल १२ हजार रुग्णांची भर पडल्याने पुढच्या काही दिवसांतच भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सर्वांत वर जाऊन स्थिर होण्याची भीती आरोग्य मंत्रालयास आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत असल्याने आता आरोग्य यंत्रणा सुधारित स्ट्रॅटेजीवर विचार करीत आहे. 

केंद्र सरकारने लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशात आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढतच आहे. देशात गेल्या २४ तासांत ३५६१ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून रुग्णांची संख्या ५२९५२ झाली आहे. त्यामध्ये, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३५९०२ असून १५२६७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, देशात आतापर्यंत १७८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून, एकट्या मुंबईत त्यातील ९ हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आहेत.सतत समन्वय, केंद्रीय पथक दोनदा पाठवूनदेखील मुंबईत दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यांच्या समन्वयावरदेखील प्रश्नचिन्ह लागले आहे. केंद्र सरकार टेस्ट कीट्स पुरेसे उपलब्ध असल्याचे सांगून राज्यांना चाचण्यांची संख्यावाढविण्याची सूचना करीत आहे. त्यातच गेल्या २४ तासात महाराष्ट्रातही 1233 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 16758 अशी झाली आहे. तर नवीन 275 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3094 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.रुग्ण

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना पहिल्याच आठवड्यात ४९ हजार ४३६ चा आकडा रुग्णसंख्येने गाठल्याने आरोग्य यंत्रणेत अस्वस्थता आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकार सज्जतेचा दावा करीत आहे. रुग्ण वाढीचे कारण मात्र अद्याप केंद्र सरकारला स्पष्ट करता आले नाही. रेड झोन, कंटेन्मेंट क्षेत्र, फिजिकल डिस्टन्सिंगवर भर देणाºया केंद्र सरकारने मद्य दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यावर गर्दी उसळली. अनेक राज्यांमध्ये त्यामुळे चिंता वाढली. मद्य दुकानांवर वाढणारी गर्दी, स्थलांतरित मजुरांची गृह राज्यात परतण्यावर आता कोरोना रुग्णांची वाढ अवलंबून असेल, असा दावा सूत्रांनी केला. आरोग्य मंत्रालय दिवसभरातून दोनदा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करीत असे. आता मात्र दिवसातून एकदाच ही आकडेवारी देण्यात येईल.

आणखी वाचा

कांद्याचे भाव गडगडणार, शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी

तळमळणाऱ्या तळीरामांचा तळतळाट टळो!

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdelhiदिल्लीMumbaiमुंबई