शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

Haryana Politics: "...तर राजीनामा देईल", दुष्यंत चौटालांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 15:09 IST

Haryana Politics : शेतकरी आंदोलनावरून हरयाणात राजकीय बदलाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसत्तेसाठी आवश्यक असलेली 45 संख्या पूर्ण करण्यासाठी भाजपा अन्य अपक्षांच्या आमदारांचा शोध घेऊ शकते.

हरयाणा : गेल्या वर्षी 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे हरयाणामधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अशा परिस्थितीत किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या जननायक जनता पार्टीने (जेजेपी) भाजपाला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले होते. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा राजकारण नाट्यमय वळण घेत आहे.

शेतकरी आंदोलनावरून हरयाणात राजकीय बदलाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. भाजपाता मित्रपक्ष असलेलेल्या दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (जेजेपी)मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून हरयाणा सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी वाढत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी नुकतीच या मुद्द्यांवर आमदारांसोबत बैठक घेतली आहे.

दुष्यंत चौटाला यांच्यावर दबाव वाढत आहे. बैठकीत पार्टीच्या आमदारांकडून शेतकरी आंदोलनाचा त्यांच्या क्षेत्रातील परिणाम, राज्यांमधील लोकांचा दृष्टीकोन इत्यादी बाबींचा अभिप्राय घेण्यात आला. विशेष म्हणजे, दुष्यंत चौटाला यांच्या पार्टीकडे केवळ 10 आमदार आहेत. परंतु तरीही ते हरयाणातील सत्ता टिकवण्याच्या आणि पाडण्याच्या स्थितीत आहेत.

दरम्यान, हरयाणामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नाही. भाजपा बहुमतापासून काही जागांपासून लांब होते. त्यानंतर दुष्यंत यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीने भाजपाला पाठिंबा दर्शविला आणि खट्टर सरकार राज्यात परत आले. सध्या हरयाणा विधानसभेत सत्ताधारी भाजपा 40 जागांसह सर्वात मोठी पार्टी आहे. काँग्रेसकडे 31 जागा आहेत. जेजेपीने 10 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय हरयाणा लोकहित पार्टी 1, आयएनएलडी 1 आणि 7 जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या.

विधानसभा निकालानंतर काँग्रेसने जेजेपी व इतरांसह आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, दुष्यंत चौटाला यांनी भाजपाला पाठिंबा देत खट्टर यांचे सरकार स्थापन केले. आता बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसचे विधानमंडळचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा पुन्हा सक्रिय झाले आहेत. काँग्रेस राज्य सरकारविरोधात अविश्वास ठराव आणू शकते.

आता जेजेपीने भाजपाकडून पाठिंबा काढून घेतल्यास भाजपाकडे 40 आमदार असतील. त्यामुळे सत्तेसाठी आवश्यक असलेली 45 संख्या पूर्ण करण्यासाठी भाजपा अन्य अपक्षांच्या आमदारांचा शोध घेऊ शकते. याचबरोबर, काँग्रेसही अन्य आमदारांसह जेजेपीला आपल्यासोबत घेऊन सत्तेचे मागील वर्षातील अपूर्ण प्रयत्न पूर्ण करण्यासाठी राजकीय डाव खेळण्याची शक्यता आहे.

...तर राजीनामा देईन - उपमुख्यमंत्रीआमच्या पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आधीच स्पष्ट केले होते की, शेतकऱ्यांना  एमएसपी मिळायला हवा. काल केंद्र सरकारने जो लेखी प्रस्ताव दिला, त्यामध्ये एमएसपीचा देखील समावेश आहे. मी उपमुख्यमंत्री आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना एमएसपी मिळवून देण्याचे काम करेन. मला ते न मिळाल्यास मी राजीनामा देईन, असे दुष्यंत चौटला यांनी म्हटले आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliticsराजकारणFarmer strikeशेतकरी संप