शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:56 IST

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff )

नवी दिल्ली - पेंगाँग सरोवर भागातील उत्तर आणि दक्षिण काठावरुन भारत-चीनचे (India-China) सैन्य मागे हटले आहे. गेली काही महिने सुरु असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीत अनेक वेळा दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले. हिंसक झटापटही झाली. मात्र, अखेर दोन्ही देशांच्या सैन्यांत सहमती होऊन  डिसएंगेजमेन्टची प्रक्रियाही सुरु झाली आहे. (NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank)

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. 

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले, की चीनसोबतच्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर एनएसए अजीत डोवाल यांच्या नेतृत्वात एक उच्च स्थरीय बैठक झाली. या बैठकीत सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवनेदेखील (manoj naravane) होते. या बैठकीत ऑगस्ट महिन्यात पेंगाँग सरोवराच्या दक्षिण काठावरील रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांवर कब्जा करण्यासंदर्भात प्लॅनिंग करण्यात आली.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

या बैठकीदरम्यान रेजांग ला, रेचन ला, हेल्मेट टॉप आणि अकी ला यांच्यासह दक्षिणेकडील उंचावरील ठिकाणांवर कब्जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामागचा हेतू चीनला चर्चेच्या प्लॅटफॉर्मवर आणणे असा होता आणि नंतर घडलेही तसेच. यानंतर भारतीय जवानांनी पेंगाँगच्या दक्षिणेकडील उंच टेकड्यांवर कब्जा केला. यामुळे चीन संपूर्ण तणावात बॅकफुटवर राहिला. यामुळे चीनवर प्रचंड दबाव होता. कारण या कब्जामुळे भारत चीनच्या तुलनेत अधिक सरस झाला. 

याशिवाय चीनसोबतच्या तणावादरम्यान हवाईदल प्रमुखही सक्रिय होते. एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे देखील उत्तरेकडील सीमावर्ती भागांवर चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या तयारीसंदर्भात एनएसएला माहिती देत होते.

अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

भारताच्या या अॅक्शनमुळे चीनला स्पष्ट संदेश मिळाला की भारत कुठल्याही प्रकारच्या आक्रमकतेचा सामना करण्यास तयार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच, आमच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच एनएसएने दिलेल्या सूचनाही अत्यंत उपयोगी आल्या, असे लष्कर प्रमुखांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखBipin Rawatबिपीन रावतmanoj naravaneमनोज नरवणे