शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:56 IST

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff )

नवी दिल्ली - पेंगाँग सरोवर भागातील उत्तर आणि दक्षिण काठावरुन भारत-चीनचे (India-China) सैन्य मागे हटले आहे. गेली काही महिने सुरु असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीत अनेक वेळा दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले. हिंसक झटापटही झाली. मात्र, अखेर दोन्ही देशांच्या सैन्यांत सहमती होऊन  डिसएंगेजमेन्टची प्रक्रियाही सुरु झाली आहे. (NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank)

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. 

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले, की चीनसोबतच्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर एनएसए अजीत डोवाल यांच्या नेतृत्वात एक उच्च स्थरीय बैठक झाली. या बैठकीत सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवनेदेखील (manoj naravane) होते. या बैठकीत ऑगस्ट महिन्यात पेंगाँग सरोवराच्या दक्षिण काठावरील रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांवर कब्जा करण्यासंदर्भात प्लॅनिंग करण्यात आली.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

या बैठकीदरम्यान रेजांग ला, रेचन ला, हेल्मेट टॉप आणि अकी ला यांच्यासह दक्षिणेकडील उंचावरील ठिकाणांवर कब्जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामागचा हेतू चीनला चर्चेच्या प्लॅटफॉर्मवर आणणे असा होता आणि नंतर घडलेही तसेच. यानंतर भारतीय जवानांनी पेंगाँगच्या दक्षिणेकडील उंच टेकड्यांवर कब्जा केला. यामुळे चीन संपूर्ण तणावात बॅकफुटवर राहिला. यामुळे चीनवर प्रचंड दबाव होता. कारण या कब्जामुळे भारत चीनच्या तुलनेत अधिक सरस झाला. 

याशिवाय चीनसोबतच्या तणावादरम्यान हवाईदल प्रमुखही सक्रिय होते. एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे देखील उत्तरेकडील सीमावर्ती भागांवर चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या तयारीसंदर्भात एनएसएला माहिती देत होते.

अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

भारताच्या या अॅक्शनमुळे चीनला स्पष्ट संदेश मिळाला की भारत कुठल्याही प्रकारच्या आक्रमकतेचा सामना करण्यास तयार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच, आमच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच एनएसएने दिलेल्या सूचनाही अत्यंत उपयोगी आल्या, असे लष्कर प्रमुखांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखBipin Rawatबिपीन रावतmanoj naravaneमनोज नरवणे