शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
8
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
9
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
10
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
11
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
12
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
13
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
14
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
15
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
16
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
17
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
18
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
19
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
20
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:56 IST

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff )

नवी दिल्ली - पेंगाँग सरोवर भागातील उत्तर आणि दक्षिण काठावरुन भारत-चीनचे (India-China) सैन्य मागे हटले आहे. गेली काही महिने सुरु असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीत अनेक वेळा दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले. हिंसक झटापटही झाली. मात्र, अखेर दोन्ही देशांच्या सैन्यांत सहमती होऊन  डिसएंगेजमेन्टची प्रक्रियाही सुरु झाली आहे. (NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank)

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. 

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले, की चीनसोबतच्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर एनएसए अजीत डोवाल यांच्या नेतृत्वात एक उच्च स्थरीय बैठक झाली. या बैठकीत सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवनेदेखील (manoj naravane) होते. या बैठकीत ऑगस्ट महिन्यात पेंगाँग सरोवराच्या दक्षिण काठावरील रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांवर कब्जा करण्यासंदर्भात प्लॅनिंग करण्यात आली.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

या बैठकीदरम्यान रेजांग ला, रेचन ला, हेल्मेट टॉप आणि अकी ला यांच्यासह दक्षिणेकडील उंचावरील ठिकाणांवर कब्जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामागचा हेतू चीनला चर्चेच्या प्लॅटफॉर्मवर आणणे असा होता आणि नंतर घडलेही तसेच. यानंतर भारतीय जवानांनी पेंगाँगच्या दक्षिणेकडील उंच टेकड्यांवर कब्जा केला. यामुळे चीन संपूर्ण तणावात बॅकफुटवर राहिला. यामुळे चीनवर प्रचंड दबाव होता. कारण या कब्जामुळे भारत चीनच्या तुलनेत अधिक सरस झाला. 

याशिवाय चीनसोबतच्या तणावादरम्यान हवाईदल प्रमुखही सक्रिय होते. एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे देखील उत्तरेकडील सीमावर्ती भागांवर चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या तयारीसंदर्भात एनएसएला माहिती देत होते.

अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

भारताच्या या अॅक्शनमुळे चीनला स्पष्ट संदेश मिळाला की भारत कुठल्याही प्रकारच्या आक्रमकतेचा सामना करण्यास तयार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच, आमच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच एनएसएने दिलेल्या सूचनाही अत्यंत उपयोगी आल्या, असे लष्कर प्रमुखांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखBipin Rawatबिपीन रावतmanoj naravaneमनोज नरवणे