शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार आल्यास लागू होणार NRC, घुसखोरांची पटणार ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:18 IST

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये.

नवी दिल्ली- आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये. भाजपानं आता पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारे नागरिकांची ओळख पटवली जाणार असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, जर आमच्या पक्षाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं, तर आसामसारखेच पश्चिम बंगालमध्येही राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC) लागू केलं जाईल. आसाममध्ये लागू झालेल्या NRCमुळे काही जण अश्रू ढाळतायत. कारण त्यांना स्वतःच्या व्होट बँकेचं राजकारण संपण्याचे संकेत मिळत आहेत.पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यास आम्ही एनआरसी लागू करू आणि अवैधरीत्या राहणा-या लोकांना बांगलादेशात परत पाठवू, येणारे दिवस हे कठीण आहेत. आम्ही कोणत्याही अवैध प्रवाशाला पश्चिम बंगालमध्ये सहन करणार नाही. तसेच जे लोक अवैध प्रवाशांचं समर्थन करतात, त्यांना देशातून निष्कासित केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसारच आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आला आहे. NRCचा मुद्दा उपस्थित करणारा काँग्रेसच आता त्याला विरोध करत आहे. आम्ही देशाची सुरक्षितता आणि अखंडतेशी कोणताही समझोता करणार नाही.तत्पूर्वी आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यातील यादीत राज्यातील 2 कोटी 89 लाख रहिवाशांना नागरिकत्वासाठी योग्य मानण्यात आले आहे. तर 40 लाख रहिवाशांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली आहेत.  एकूण 3 कोटी 29 लाख 91 हजार 380 रहिवाशांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 2 कोटी, 89 लाख, 38 हजार 677 रहिवाशी नागरिकत्वासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले. तर सुमारे 40 लाख रहिवासी अवैधपणे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची नावे या मसुद्यातून वगळण्यात आली आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालAssamआसाम