शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 21:25 IST

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, महाकुंभात सनातन कसे टिकेल, यावर चर्चा व्हायला हवी. हिंदुत्व कसे जागृत होईल? हिंदू राष्ट्र कसे निर्माण होईल? हिंदूंची घर वापसी कशी होईल? यावर काम व्हयला हवे...

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महाकुंभ मेळ्यासंदर्भात मोठे विधान केले आहे. महाकुंभ आपल्या उद्देशापासून भरकटत आहे. महाकुंभ हा व्हायरल होणारा विषय नाही. महाकुंभमेळा हा श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रचार करण्याचा विषय आहे. महाकुंभ हा रीलसाठी नव्हे, तर रिअलसाठी ओळखला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून मी बघतोय, महाकुंभ मेळ्यातील अनेक लोकांच्या रील्स व्हायरल होत आहेत. मी याच्या बाजूने नाही. मी याचा विरोध करतो. महाकुंभ मेळ्यात चर्चा व्हायला हवी. 

महाकुंभ मेळ्यात चर्चा व्हायला हवी -धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, महाकुंभात सनातन कसे टिकेल, यावर चर्चा व्हायला हवी. हिंदुत्व कसे जागृत होईल? हिंदू राष्ट्र कसे निर्माण होईल? हिंदूंची घर वापसी कशी होईल? यावर काम व्हयला हवे.

महाकुंभमेळ्यात कार्यक्रमाची घोषणा -धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, ते कुंभ मेळ्यात जात आहेत. तेथे एक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचा संकल्प 'हिंदूंना जगओ, हिंदुस्तान बचाओ', असा असेल. धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, सध्या परदेशी शक्तींकडून भारतात धर्मांतरणाला प्रोत्साहित केले जात आहे. देशातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, तेलंगाणा, ओडिशा आणि आसाम सारख्या राज्यात प्रलोभने देऊन हिंदूंचे धर्मांतरण केले जात आहे.

हनुमान चालीसा बागेश्वर मंडळं तयार केली जाणार -धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, जर भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला हिंदूंचे धर्मांतर थांबवावे लागेल. यासाठी आम्ही एक नवीन प्रतिज्ञा घेतली आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी जिल्हा, गाव आणि वसाहत पातळीवर 'हनुमान चालीसा बागेश्वर मंडळ' स्थापन केले जाणार. जर भविष्यात, रस्त्यावर उतरायची वेळ आलीच, तर हनुमान चालीसा बागेश्वर मंडळाचे भक्त, सदस्य आणि स्वयंसेवक एखाद्या 'सेने'च्या स्वरुपात रस्त्यावर उतरण्यासाठी तयार असतील. यात आदिवासी समाजाची प्रमुख भूमिका असेल. यांद्वारे आपण देशभरातील आदिवासींना धर्मांतराच्या विरोधात एकत्र करू. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामKumbh Melaकुंभ मेळाHinduismहिंदुइझम