शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता काँग्रेसचे आमदार गुवाहाटीला जाणार?; महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात ऑपरेशन लोटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:24 IST

पश्चिम बंगालमध्ये ज्या काँग्रेस आमदारांना पकडले गेले त्यांच्याकडून कॅश जप्त करण्यात आली आहे

नवी दिल्ली - सध्या आसाम 'ऑपरेशन लोटस'चं केंद्र बनलंय का? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर आता झारखंडमध्येही ऑपरेशन लोटसची पटकथा लिहिली जात आहे. झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांना बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. काँग्रेस अन्य एका आमदाराने आरोप लावला आहे की, पक्षाचे ३ आमदार गुवाहाटीला जात होते. ज्याठिकाणी झारखंडमध्ये भाजपा सरकार बनवण्याची रणनीती आखली जात आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीसरकारविरोधात बंड पुकारणारे शिवसेना आमदार गुजरातच्या सूरतमार्गे आसामच्या गुवाहाटीला पोहचले होते. आसाममध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करत महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटस यशस्वी केले होते. झारखंडमध्येही त्याच धर्तीवर हेमंत सोरेन सरकारविरोधात सत्तांतर करत भाजपा सरकार बनवण्याची रणनीती आखली जात आहे. तत्पूर्वी काँग्रेस आमदार आसामला पोहचण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती ते लागले आहेत. 

झारखंडमधील काँग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छप, नमन बिक्सल कोंगारी यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. बंगालच्या रानीहाटीमार्गे हायवेवर पोलिसांनी ही कारवाई केली. अशावेळी काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल सिंह यांनी आरोप लावला आहे की, पश्चिम बंगालमध्ये ज्या काँग्रेस आमदारांना पकडले गेले त्यांच्याकडून कॅश जप्त करण्यात आली आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि कोलकाता येण्यास सांगितले. 

जयमंगल सिंह म्हणाले की, ३ आमदारांनी सांगितले गुवाहाटीत गेल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना भेटण्यास जाणार असून झारखंडमध्ये भाजपा सरकार आणण्याचं प्लॅनिंग रचलं जाईल. जितके आमदार फुटतील त्या सर्वांना मंत्री बनवलं जाईल. त्याशिवाय प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये मिळतील. झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी त्यांना भाजपाची मदत करावी लागेल असंही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील सत्ता उलटवण्यासाठी आसामचा वापर केला गेला. त्यामुळे भाजपाच्या ऑपरेशन लोटससाठी आसाम केंद्र बिंदू बनलय का? असा प्रश्न उपस्थित होतो. झारखंडमधील सत्तानाट्यात सीएम हिमंत बिस्वा सरमा यांची भूमिका आहे? भाजपानं जे महाराष्ट्रात केले तेच पुन्हा झारखंडबाबतीत करत आहे असा आरोप काँग्रेसनं लावला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, झारखंडमध्ये भाजपाचं ऑपरेशन लोटस पश्चिम बंगालमध्ये उघड झाले. सरकार अस्थिर करण्यासाठी खुद्द एका राज्याचे मुख्यमंत्री थेट आमदारांशी संपर्क साधत आहेत. केंद्रातील मंत्री त्यांना धमकावत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही सत्तापरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाJharkhandझारखंडcongressकाँग्रेस