शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:43 IST

भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला. पाच वर्षांपूर्वी आलेली मोदी लाट जराही न ओसरता उलट जबरदस्त त्सुनामी होऊन धडकली व तिच्या तडाख्याने सत्ताकांक्षेने एकवटलेले सारे विरोधक पार चितपट झाले. या त्सुनामीवर आरुढ होत भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने न भूतो असा विजय मिळवत दिल्लीच्या सिंहासनावरील मांड अधिक भक्कम केली. एकट्या भाजपने ३०३ जागांचा पल्ला गाठत १७ व्या लोकसभेतील ‘रालोआ’चे संख्याबळ ३५०च्या जवळ नेले.‘मोदी हटाव’ असा एककलमी कार्यक्रम घेत ‘चौकीदार चोर है’, असा घोषा लावलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली. गेल्या लोकसभेत ४४ असा निचांक गाठलेल्या काँग्रेसची यावेळी जेमतेम ५० पार करताना दमछाक झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ व इतरांचे ‘महागठबंधन’ या विरोधकांच्या दोन्ही आघाड्या प्रत्येकी शतकही गाठू सकल्या नाहीत.सलग पाच वर्षे सत्तेवर राहूनही मतदारांची फेरपसंती मिळविण्याची किमया मोदी-अमित शहा या जादुई जोडीने करून दाखविली. यावेळी भाजपाला मिळालेली सुमारे ४५ टक्के मते हा या पक्षास गेल्या ३९ वर्षांत मिळालेला सर्वात मोठा जनाधारठरला. यासाठी या दोघांनी अनुक्रमे सरकारच्या व पक्षाच्या पातळीवर अपार मेहनत घेतली.स्वत: मोदी यांनी १४२ प्रचारसभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने केलेले प्रहार, सर्जिकल स्ट्राईकचा हवाला देत जागविलेला राष्ट्रवाद व कोट्यवधी कुटुंबांना नवी आशा देणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना यांनी हे घवघवीत यश मिळवून दिले. या योजनांनी व मोदींच्या करिष्म्याने तब्बल २७ राज्यांमधील मतदारांवर गारुड केले. ‘गरिबी हटाओ’चा नारा देत इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत ३५१ जागा जिंकल्या होत्या त्याचीच ही जणू दुसरी आवृत्ती होती.>लाटेत आले अन् भूईसपाट झाले...मोदींची ही त्सुनामी एवढी जबरदस्तहोती की, बिहार, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, आसाम व संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष पुरते भूईसपाट झाले. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्येही काँग्रेसचा धुुव्वा उडाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विधानसभेची माळ काँग्रेसच्या गळ््यात घालणाºया मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्येही तेच चित्र दिसले. कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या दारुण पराभवासह मल्लिकार्जून खारगे व वीरप्पा मोईली यांच्यासारख्या त्यांच्या दिग्गज नेत्यांचाही या लाटेत टिकाव लागला नाही. एकट्या पंजाबने काँग्रेसची लाज राखली.

----------सरकारसमोर आव्हाने- एस. के. गुप्तानोटबंदीमुळे ३५ लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले. मतदारांच्या मनातील बेरोजगारीचे भय दूर करण्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील.जीएसटी सुलभ करण्याचा वायदा मोदी सरकारने निवडणुकीत केला होता. हा वायदा सरकार पूर्ण करील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी निधी वाढवावा लागेल. पदवीसोबतच कौशल्य विकासावर लक्ष द्यावे लागेल.बहुमत असलेले स्थिर सरकार आल्यास थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघही वाढतो. तथापि, नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, यावर हे अवलंबून असेल.देशाची अर्थव्यवस्था व सुरक्षा भक्कम करण्यासाठी चांगल्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाBJPभाजपा