शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:43 IST

भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला. पाच वर्षांपूर्वी आलेली मोदी लाट जराही न ओसरता उलट जबरदस्त त्सुनामी होऊन धडकली व तिच्या तडाख्याने सत्ताकांक्षेने एकवटलेले सारे विरोधक पार चितपट झाले. या त्सुनामीवर आरुढ होत भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने न भूतो असा विजय मिळवत दिल्लीच्या सिंहासनावरील मांड अधिक भक्कम केली. एकट्या भाजपने ३०३ जागांचा पल्ला गाठत १७ व्या लोकसभेतील ‘रालोआ’चे संख्याबळ ३५०च्या जवळ नेले.‘मोदी हटाव’ असा एककलमी कार्यक्रम घेत ‘चौकीदार चोर है’, असा घोषा लावलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली. गेल्या लोकसभेत ४४ असा निचांक गाठलेल्या काँग्रेसची यावेळी जेमतेम ५० पार करताना दमछाक झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ व इतरांचे ‘महागठबंधन’ या विरोधकांच्या दोन्ही आघाड्या प्रत्येकी शतकही गाठू सकल्या नाहीत.सलग पाच वर्षे सत्तेवर राहूनही मतदारांची फेरपसंती मिळविण्याची किमया मोदी-अमित शहा या जादुई जोडीने करून दाखविली. यावेळी भाजपाला मिळालेली सुमारे ४५ टक्के मते हा या पक्षास गेल्या ३९ वर्षांत मिळालेला सर्वात मोठा जनाधारठरला. यासाठी या दोघांनी अनुक्रमे सरकारच्या व पक्षाच्या पातळीवर अपार मेहनत घेतली.स्वत: मोदी यांनी १४२ प्रचारसभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने केलेले प्रहार, सर्जिकल स्ट्राईकचा हवाला देत जागविलेला राष्ट्रवाद व कोट्यवधी कुटुंबांना नवी आशा देणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना यांनी हे घवघवीत यश मिळवून दिले. या योजनांनी व मोदींच्या करिष्म्याने तब्बल २७ राज्यांमधील मतदारांवर गारुड केले. ‘गरिबी हटाओ’चा नारा देत इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत ३५१ जागा जिंकल्या होत्या त्याचीच ही जणू दुसरी आवृत्ती होती.>लाटेत आले अन् भूईसपाट झाले...मोदींची ही त्सुनामी एवढी जबरदस्तहोती की, बिहार, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, आसाम व संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष पुरते भूईसपाट झाले. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्येही काँग्रेसचा धुुव्वा उडाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विधानसभेची माळ काँग्रेसच्या गळ््यात घालणाºया मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्येही तेच चित्र दिसले. कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या दारुण पराभवासह मल्लिकार्जून खारगे व वीरप्पा मोईली यांच्यासारख्या त्यांच्या दिग्गज नेत्यांचाही या लाटेत टिकाव लागला नाही. एकट्या पंजाबने काँग्रेसची लाज राखली.

----------सरकारसमोर आव्हाने- एस. के. गुप्तानोटबंदीमुळे ३५ लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले. मतदारांच्या मनातील बेरोजगारीचे भय दूर करण्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील.जीएसटी सुलभ करण्याचा वायदा मोदी सरकारने निवडणुकीत केला होता. हा वायदा सरकार पूर्ण करील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी निधी वाढवावा लागेल. पदवीसोबतच कौशल्य विकासावर लक्ष द्यावे लागेल.बहुमत असलेले स्थिर सरकार आल्यास थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघही वाढतो. तथापि, नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, यावर हे अवलंबून असेल.देशाची अर्थव्यवस्था व सुरक्षा भक्कम करण्यासाठी चांगल्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाBJPभाजपा