शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:43 IST

भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला. पाच वर्षांपूर्वी आलेली मोदी लाट जराही न ओसरता उलट जबरदस्त त्सुनामी होऊन धडकली व तिच्या तडाख्याने सत्ताकांक्षेने एकवटलेले सारे विरोधक पार चितपट झाले. या त्सुनामीवर आरुढ होत भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने न भूतो असा विजय मिळवत दिल्लीच्या सिंहासनावरील मांड अधिक भक्कम केली. एकट्या भाजपने ३०३ जागांचा पल्ला गाठत १७ व्या लोकसभेतील ‘रालोआ’चे संख्याबळ ३५०च्या जवळ नेले.‘मोदी हटाव’ असा एककलमी कार्यक्रम घेत ‘चौकीदार चोर है’, असा घोषा लावलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली. गेल्या लोकसभेत ४४ असा निचांक गाठलेल्या काँग्रेसची यावेळी जेमतेम ५० पार करताना दमछाक झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ व इतरांचे ‘महागठबंधन’ या विरोधकांच्या दोन्ही आघाड्या प्रत्येकी शतकही गाठू सकल्या नाहीत.सलग पाच वर्षे सत्तेवर राहूनही मतदारांची फेरपसंती मिळविण्याची किमया मोदी-अमित शहा या जादुई जोडीने करून दाखविली. यावेळी भाजपाला मिळालेली सुमारे ४५ टक्के मते हा या पक्षास गेल्या ३९ वर्षांत मिळालेला सर्वात मोठा जनाधारठरला. यासाठी या दोघांनी अनुक्रमे सरकारच्या व पक्षाच्या पातळीवर अपार मेहनत घेतली.स्वत: मोदी यांनी १४२ प्रचारसभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने केलेले प्रहार, सर्जिकल स्ट्राईकचा हवाला देत जागविलेला राष्ट्रवाद व कोट्यवधी कुटुंबांना नवी आशा देणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना यांनी हे घवघवीत यश मिळवून दिले. या योजनांनी व मोदींच्या करिष्म्याने तब्बल २७ राज्यांमधील मतदारांवर गारुड केले. ‘गरिबी हटाओ’चा नारा देत इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत ३५१ जागा जिंकल्या होत्या त्याचीच ही जणू दुसरी आवृत्ती होती.>लाटेत आले अन् भूईसपाट झाले...मोदींची ही त्सुनामी एवढी जबरदस्तहोती की, बिहार, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, आसाम व संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष पुरते भूईसपाट झाले. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्येही काँग्रेसचा धुुव्वा उडाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विधानसभेची माळ काँग्रेसच्या गळ््यात घालणाºया मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्येही तेच चित्र दिसले. कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या दारुण पराभवासह मल्लिकार्जून खारगे व वीरप्पा मोईली यांच्यासारख्या त्यांच्या दिग्गज नेत्यांचाही या लाटेत टिकाव लागला नाही. एकट्या पंजाबने काँग्रेसची लाज राखली.

----------सरकारसमोर आव्हाने- एस. के. गुप्तानोटबंदीमुळे ३५ लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले. मतदारांच्या मनातील बेरोजगारीचे भय दूर करण्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील.जीएसटी सुलभ करण्याचा वायदा मोदी सरकारने निवडणुकीत केला होता. हा वायदा सरकार पूर्ण करील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी निधी वाढवावा लागेल. पदवीसोबतच कौशल्य विकासावर लक्ष द्यावे लागेल.बहुमत असलेले स्थिर सरकार आल्यास थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघही वाढतो. तथापि, नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, यावर हे अवलंबून असेल.देशाची अर्थव्यवस्था व सुरक्षा भक्कम करण्यासाठी चांगल्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाBJPभाजपा