शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:43 IST

भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला. पाच वर्षांपूर्वी आलेली मोदी लाट जराही न ओसरता उलट जबरदस्त त्सुनामी होऊन धडकली व तिच्या तडाख्याने सत्ताकांक्षेने एकवटलेले सारे विरोधक पार चितपट झाले. या त्सुनामीवर आरुढ होत भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने न भूतो असा विजय मिळवत दिल्लीच्या सिंहासनावरील मांड अधिक भक्कम केली. एकट्या भाजपने ३०३ जागांचा पल्ला गाठत १७ व्या लोकसभेतील ‘रालोआ’चे संख्याबळ ३५०च्या जवळ नेले.‘मोदी हटाव’ असा एककलमी कार्यक्रम घेत ‘चौकीदार चोर है’, असा घोषा लावलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली. गेल्या लोकसभेत ४४ असा निचांक गाठलेल्या काँग्रेसची यावेळी जेमतेम ५० पार करताना दमछाक झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ व इतरांचे ‘महागठबंधन’ या विरोधकांच्या दोन्ही आघाड्या प्रत्येकी शतकही गाठू सकल्या नाहीत.सलग पाच वर्षे सत्तेवर राहूनही मतदारांची फेरपसंती मिळविण्याची किमया मोदी-अमित शहा या जादुई जोडीने करून दाखविली. यावेळी भाजपाला मिळालेली सुमारे ४५ टक्के मते हा या पक्षास गेल्या ३९ वर्षांत मिळालेला सर्वात मोठा जनाधारठरला. यासाठी या दोघांनी अनुक्रमे सरकारच्या व पक्षाच्या पातळीवर अपार मेहनत घेतली.स्वत: मोदी यांनी १४२ प्रचारसभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने केलेले प्रहार, सर्जिकल स्ट्राईकचा हवाला देत जागविलेला राष्ट्रवाद व कोट्यवधी कुटुंबांना नवी आशा देणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना यांनी हे घवघवीत यश मिळवून दिले. या योजनांनी व मोदींच्या करिष्म्याने तब्बल २७ राज्यांमधील मतदारांवर गारुड केले. ‘गरिबी हटाओ’चा नारा देत इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत ३५१ जागा जिंकल्या होत्या त्याचीच ही जणू दुसरी आवृत्ती होती.>लाटेत आले अन् भूईसपाट झाले...मोदींची ही त्सुनामी एवढी जबरदस्तहोती की, बिहार, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, आसाम व संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष पुरते भूईसपाट झाले. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्येही काँग्रेसचा धुुव्वा उडाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विधानसभेची माळ काँग्रेसच्या गळ््यात घालणाºया मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्येही तेच चित्र दिसले. कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या दारुण पराभवासह मल्लिकार्जून खारगे व वीरप्पा मोईली यांच्यासारख्या त्यांच्या दिग्गज नेत्यांचाही या लाटेत टिकाव लागला नाही. एकट्या पंजाबने काँग्रेसची लाज राखली.

----------सरकारसमोर आव्हाने- एस. के. गुप्तानोटबंदीमुळे ३५ लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले. मतदारांच्या मनातील बेरोजगारीचे भय दूर करण्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील.जीएसटी सुलभ करण्याचा वायदा मोदी सरकारने निवडणुकीत केला होता. हा वायदा सरकार पूर्ण करील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी निधी वाढवावा लागेल. पदवीसोबतच कौशल्य विकासावर लक्ष द्यावे लागेल.बहुमत असलेले स्थिर सरकार आल्यास थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघही वाढतो. तथापि, नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, यावर हे अवलंबून असेल.देशाची अर्थव्यवस्था व सुरक्षा भक्कम करण्यासाठी चांगल्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाBJPभाजपा