शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आता ब्राह्मोस गाठणार ४५० किमीचा टप्पा, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:57 IST

मुंबई : सुखोईवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता साडेचारशे किमीपर्यंत मारा करू शकणार आहे.

चिन्मय काळेमुंबई : सुखोईवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता साडेचारशे किमीपर्यंत मारा करू शकणारआहे. ‘ब्राह्मोस मार्क टू’ या क्षेपणास्त्राचे उत्पादन पुढील वर्षी सुरू होत आहे. भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याने हे शक्यहोत आहे.आवाजापेक्षा जलदगतीने मारा करणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र बुधवारी सुखोई लढाऊ विमानातून यशस्वीपणे डागण्यात आले. या यशानंतर आता पुढील स्तराच्या उत्पादनाची तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये हवाईदलाला मार्चपासून तर नौदलाला त्यानंतर पुढील श्रेणीतील ब्राह्मोसचा पुरवठा केला जाईल, असे ब्राह्मोस लिमिटेडच्या महाराष्टÑातील कारखान्याचे महाव्यवस्थापक मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नव्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला मागून वेग देणारा पंखा लावला जाणार नाही. याचे कारण सुखोई विमानाचा वेग तसाही २२०० किमी प्रति तास आहे. एवढ्या वेगाने उडणाºया विमानाने मारा करण्यासाठी पंख्याची गरज नाही. पंखा काढल्यानेच या क्षेपणास्त्राचे वजन ८०० किलोने कमी होणार आहे.>काय आहे ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गट’क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गट (एमटीसीआर) जगातील35 देशांचा समूह. संयुक्त राष्टÑांच्या नियमानुसार, सुपरसोनिक वेगाने कुठल्याही क्षेपणास्त्राची मारक क्षमता300 किमीपेक्षा अधिक ठेवण्यास मज्जाव आहे. भारताला तीन महिन्यांपूर्वीच या गटाचे सदस्यत्व मिळाले. परंतु, सुखोईवरील यशस्वी चाचणीची प्रतीक्षा होती. ती होताच आता ४५० किमीच्या ब्राह्मोससाठी हालचाली जलद सुरू झाल्याची माहिती विशेष सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.अनेक देश यांत अधिक मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे तयार करीत आहेत. अशा सर्वांनी एकत्र येत हा गट स्थापन केला. त्याचे सदस्यत्व मिळणारे राष्टÑ लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करू शकतात.पुढील ब्राह्मोस हे ४५० किमीपर्यंत मारा करणारे असेल.सुखोई विमानाने हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी त्याचे वजन ०.८ टनापर्यंत (८०० किलो) कमी केले जाणार आहे.

टॅग्स :Indiaभारतfighter jetलढाऊ विमान