शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र देशातील "या" ठिकाणी एकही रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 12:03 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 97,67,372 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,522 नवे रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली - संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने सहा कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 97,67,372 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,522 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 412 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,41,772 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 

लक्षद्वीपमधील जनजीवन नेहमीप्रमाणे सर्वसामान्य आहे. येथे आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ना मास्क, ना सॅनिटायझर आणि कोविड-19 च्या इतर अनेक नियमांचा कोणताही प्रकार येथे पाहायला मिळत नाही. लग्न समारंभापासून ते इतर अनेक कार्यक्रमांतर्गत येथे लोक नेहमी सारखेच एकमेकांना भेटत आहेत. लक्षद्वीपमध्ये सर्वकाही सर्वसामान्यपणे होत आहे याचे कारण अरबी समुद्रात असलेल्या या द्वीपावर लोकांनी सहज प्रवेश करू नये म्हणून एसओपीचे अतिशय कठोरपणे पालन केले जाते. 

सर्वसामान्य असो किंवा अधिकारी वा जनप्रतिनिधी, 7 दिवस क्वारंटीन राहिल्यानंतरच प्रवेश

लोकसभेत लक्षद्वीपचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीलाच लक्षद्वीपने कोविड-19 च्या महासाथीला रोखले होते. आठ डिसेंबरपर्यंत लक्षद्वीपमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. "आम्ही घेतलेल्या काळजीमुळे आतापर्यंत लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कडक नियमांचे पालन केल्यानंतरच 36 वर्ग किलोमीटरच्या या द्वीपावर प्रवेश मिळू शकतो. मग ती एक सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग अधिकारी वा जनप्रतिनिधी. सर्वांनाच कोच्चीमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन राहण्याबरोबरच इतर अनेक नियमही पाळावे लागतात" असं त्यांनी म्हटलं आहे. 

कोच्ची हा एक असा पॉइंट आहे जेथे जहाज किंवा मग हेलिकॉप्टरद्वारे द्वीपापर्यंत जाता येते. द्वीपावर मात्र लोकांसाठी कोणत्याही प्रकारचे नियम आणि बंधने नाहीत. ना मास्क, ना सॅनिटायझर... कारण हे एक हरित क्षेत्र असल्याची माहिती फैजल यांनी दिली आहे. लक्षद्वीप अशी एकमात्र जागा आहे जेथे शाळा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्याची परवानगी दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत