शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चौकीदार भागीदारच नव्हे, तर गुन्हेगारही; मल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 23:33 IST

राफेल सौदा आणि विजय मल्ल्याप्रकरणावरुन काँग्रेसची भाजपावर सडकून टीका

नवी दिल्ली : राफेल सौदा आणि विजय मल्ल्याप्रकरणीकाँग्रेसने शुक्रवारीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. मल्ल्याला विदेशात पसार करण्यात वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कथित भूमिकेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करून सवाल उपस्थित केला आहे. मल्ल्याला विदेशात जाण्यापासून रोखण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसचे रूपांतर सीबीआयने गुपचूपपणे सूचनावजा नोटिसीत केले. सीबीआय थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणात येते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या संमतीशिवाय सीबीआयने नोटिसीत परस्पर बदल केला, यावर विश्वासच बसत नाही.प्रश्नांची सरबत्ती करून काँग्रेसने मोदींवर थेट निशाणा साधला. चौकीदार, भागीदारच नव्हेतर गुन्हेगारही आहे, असा थेट आरोपही काँग्रेसने केला. राहुल गांधी यांनी दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांनाही घेरले आहे. अडीच वर्षांपूर्वी मल्ल्याशी झालेल्या भेटीबाबत एकाही तपास संस्थेला त्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही. मल्ल्याने आपण लंडनला जात असल्याचे सांगितले होते, असे त्यांना अचानक आठवले. यातून जेटली यांची भूमिका काय होती, असे स्पष्ट होते.राहुल यांच्या टिष्ट्वटनंतर काँग्रेसने चौफेर आरोपांच्या फैरी झाडल्या. भाजपमध्येही जेटली कोंडीत सापडले आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि कीर्ती आझाद यांनी गंभीर आरोप करून लूक आऊट नोटीसला सीबीआयकडून कोणी बदलून घेतले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. काँग्रेसने विचारले आहे की, चौकशीविना विजय मल्ल्या ५६ सुटकेसेस घेऊन लंडनला पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? मार्च २०१६ मध्ये राज्यसभेत मल्ल्यावर झालेल्या चर्चेत जेटली यांनी या भेटीचा खुलासा का केलानाही?सर्वोच्च न्यायालयातील वकील दुष्यंत देव यांच्याकडे २८ फेब्रुवारी २०१६ रोजी स्टेट बँकेचे अधिकारी मल्ल्या प्रकरणात सल्ला मागायला गेले होते. दवे यांनी सल्ला दिला की, २९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल करून मल्ल्या याचा पासपोर्ट रद्द करावा, नाही तर तो देश सोडून पळून जाईल; परंतु एसबीआयने पासपोर्ट रद्द करण्यासाठी अर्ज केला नाही व परत दवे यांच्याकडे ते अधिकारी आलेही नाहीत.काँग्रेसने विचारले की, मल्ल्या याला संरक्षण देण्यासाठी स्टेट बँकेला लगाम घालणारा कोण होता? असाच प्रश्न जेटली यांचे मित्र व माजी अटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनीही विचारला आहे. ते म्हणाले की, देश सोडून जा, असा सल्ला मल्ल्या याला कोणी दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करून म्हटले आहे की, चौकीदार भागीदारच नाही तर गुन्हेगारदेखील आहे.कोणाच्या इशाºयावरून मोकळीक?कोणाच्या इशाºयावरून सीबीआय, ईडी, एसएफआयओने विजय मल्ल्याला पळून जाण्याची मोकळीक देऊन त्यांचा बचाव केला? हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे. पी. एल. पुनिया यांच्या आरोपावर जेटली गप्प का? हिंमत असेल तर त्यांनी पुनिया खोटे बोलत असल्याचे सांगावे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.लंडनला जाण्याच्या एक दिवस आधी मल्ल्या आणि जेटली यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आपसात चर्चा करताना पाहिले, असा पुनिया यांचा दावा आहे. त्यावेळी मीसुद्धा मध्यवर्ती सभागृहात होतो, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी स्पष्ट करून पुनिया यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याcongressकाँग्रेसBJPभाजपा